अल्प मुदतीसाठी
अल्प व मध्यम मुदतीसाठी कर्जरोखे आधारीत (Debt Fund) योजना:
अशाप्रकारच्या योजनेतील गुंतवणूक हि बहुतांशी अल्प मुदतीच्या मनी मार्केट सिक्युरिटीमध्ये व थोडी रक्कम हि अल्प मुदतीच्या कर्जरोख्यात केली जाते. जेव्हा व्याजदरात वाढ होते तेव्हा अशा प्रकारच्या योजनेतून चांगले उत्पन्न मिळते. या योजनेत जोखीम जवळपास नसते. या प्रकारच्या योजनेत अगदी २/३ दिवस ते ६ महिने एवढ्या काळासाठी गुंतवणूक करणे योग्य होते. ज्याच्या बचत व चालू खात्यात जास्तीची रक्कम असते त्यानी या योजनेत अवश्य गुंतवणूक करावी. तसेच पतसंस्था, ट्रस्ट,सोसायटी, कंपन्या, व्यापारी ज्याच्या चालू खात्यात मोठी रक्कम शिल्लक असेल त्याप्रत्येक वेळी या योजनेत (लिक्वीड फंड) गुंतवणूक करुन जास्त उत्पन्न मिळवण्याची संधी घ्यावी.
- Published in Debt Funds
लिक्वीड फंड
अल्प व मध्यम मुदतीसाठी Liquid Fund योजना:
अशाप्रकारच्या योजनेतील गुंतवणूक हि बहुतांशी अल्प मुदतीच्या मनी मार्केट सिक्युरिटीमध्ये व थोडी रक्कम हि अल्प मुदतीच्या कर्जरोख्यात केली जाते. जेव्हा व्याजदरात वाढ होते तेव्हा अशा प्रकारच्या योजनेतून चांगले उत्पन्न मिळते. या योजनेत जोखीम जवळपास नसते. या प्रकारच्या योजनेत अगदी २/३ दिवस ते ६ महिने एवढ्या काळासाठी गुंतवणूक करणे योग्य होते. ज्याच्या बचत व चालू खात्यात जास्तीची रक्कम असते त्यानी या योजनेत अवश्य गुंतवणूक करावी. तसेच पतसंस्था, ट्रस्ट, सोसायटी, कंपन्या, व्यापारी ज्याच्या चालू खात्यात मोठी रक्कम शिल्लक असेल त्याप्रत्येक वेळी या योजनेत (लिक्वीड फंड) गुंतवणूक करुन जास्त उत्पन्न मिळवण्याची संधी घ्यावी. प्रत्येक कंपनीचा लिक्वीड फंड असतो, सरासरी उत्पन्न वार्षीक ८% मिळते (साधारणपणे बँक एफ.डी. पेक्षा १/२ टक्का जास्त मिळते – मात्र हे उत्पन्न किती मिळेल याची कोणतीही खात्री दिली जात नाही).
- Published in Debt Funds
बॅंक एफङी व ङेट फंङ तुलना
बँक एफ.डी. व डेब्ट फंड योजना एक तुलना
बँक एफ.डी. | डेब्ट फंड योजना |
सध्या एक वर्षाचे एफ.डी. साठी ७.५% व्याजदर आहे. | डेब्ट फंडाचे योजनेत सध्या सरासरी ८.८६% एवढा परतावा मिळत आहे, जर रेपो रेट अजून कमी झाला तर मिळणार हाच परतावा शॉर्ट टर्म डेट फंड योजनेत ९.५% पर्यंत जाऊ शकेल. |
१०% दराने टी.डी.एस. ची कपात केली जाते. | टी.डी.एस. लागू नाही म्हणून कपात केली जात नाही. |
मिळणाऱ्या व्याजावर ३०% पर्यंत कर आकारणी होऊ शकते. | किमान ३ वर्षे अधिक १ दिवस एवढ्या काळासाठी गुंतवणूक केल्यास मिळणाऱ्या लाभावर इंडेक्सेशनचा फायदा मिळतो ज्यामुळे फारच कमी कर आकारणी होते. |
समजा तुम्ही रु.१० लाखाची एफ.डी. केली आहे,काही महिन्यांनी तुम्हाला अजून रु.२ लाख गुंतावावयाचे असतील तर तुम्हाला नवीन एफ.डी.करावी लागेल. | त्याच डेब्ट फंडाचे योजनेत तुम्ही कितीही वेळा जास्तीची गुंतवणूक करू शकता. |
समजा तुम्ही रु.१० लाखाची एफ.डी. केली आहे,काही महिन्यांनी तुम्हाला रु.२ लाख काही कारणासाठी लागणार असतील तर पूर्ण एफ.डी.मोडावी लागेल, व उरलेल्या रु.८ लाखाची परत एफ.डी. करावी लागेल. | समजा तुम्ही रु.१० लाखाची एफ.डी. केली आहे, काही महिन्यांनी तुम्हाला रु.२ लाखकाही कारणासाठी लागणार असतील तर,तेवढेच पैसे काढून गुंतवणूक पुढे चालू ठेवता येते. |
मुदत संपल्यावर मुदत वाढवावयाची असल्यासनुतनीकरण करावे लागते. | कितीही काळ गुंतवणूक केली तरी कधीचनुतनीकरण करावे लागत नाही. |
एफ.डी. मोडली तर मिळणाऱ्या व्याजात कपात केली जाते. | कोणतीही कपात केली जात नाही संपूर्ण रक्कम मिळते (अटी लागू) |
- Published in Debt Funds
डेब्ट फंडाचे प्रकार
डेट फंड योजनांचे प्रकार:
ओपन एंडेड योजना
या प्रकारचे योजनेत बँकेचे बचत खात्याप्रमाणे केव्हाही पैसे भरता येतात अथवा काढता येतात म्हणजेच थोडक्यात कमी अथवा जास्त मुदतीसाठी गुंतवणूक करता येते.
लिक्वीड स्किम्स्
या योजना या ज्याना कमी कालावधी म्हणजे अगदि 2 ते 30 दिवस अथवा 1 ते 3 महिन्यांसाठीच पैसे गुंतवावयाचे असतात त्यांचेसाठी अतीशय चांगल्या आहेत. या प्रकारचे योजनेतील 100% पैसे हे कमी कालावधीचे मनी मार्केट साधनात गुंतवले जातात, ज्यातील सर्वाधीक रक्कम हि कॉल मनी मार्केट मध्ये गुंतवली जाते. ज्यांचे पैसे बँकेचे चालू खात्यात किंवा बचत खात्यात मोठ्या प्रमाणावर कमी कालावधीसाठी असतात त्यांचेसाठी ह्या प्रकारची योजना हे एक वरदानच आहे. मात्र मनी मार्केट व लिक्वीड योजनांना डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टँक्स 28.33% दराने लागत असल्यामुळे यातील ब-याच योजना या लिक्वीड प्लस स्वरुपाच्या असतात ज्यावर वैयक्तीक गुंतवणूकदारांसाठी डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टँक्स 14.16% एवढाच असतो.
या योजनात गुंतवणूकीचे फायदे:
- सुरक्षीतता व रोखता.
- या प्रकारचे योजनेत व्याज दराचे बदलाचा धोका जवळपास अजिबात नसतो कारण यातील गुंतवणूक हि कमी कालावधीचे सिक्युरिटीजमध्येच केली जाते जसे कि बँक डिपॉझीट, ट्रेझरी बिल्स व कमर्शिअल रोख्यात.
- गुंतवणूक करताना व रक्कम काढताना कोणताही आकार लागत नाही. (No entry or exit load).
या योजनात गुंतवणूकीतील जोखिम:
- कमी (मात्र स्थिर) परतावा.
- जर दिर्घ मुदतीचे रोख्यात फंड मँनेजरने गुंतवणूक केली तर व्याज दराचे बदलाचा धोका संभवतो. मात्र असे शक्यतो केले जात नाही.
फ्लोटिंग रेट फंड:
दिर्घ मुदतीच्या रोख्यांना वाढत्या व्याजदरांचा जास्त फटका बसतो. असा धोका कमी करण्यासाठी या योजनेत कमी मुदतीच्या आणि/किंवा बदलत्या व्याजदराचे रोखे घेतले जातात. बाजारातील व्याजदरांतील बदलांनुसार यातील रोख्यांचे व्याजदरही बदलत असल्यामुळे त्यांचे बाजारातील किंमतीवर फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे गुंतवणूकदाराला अशा योजनेतून प्रचलित व्याजदाराएवढा परतावा मिळू शकतो. या योजनेत कमी मुदतीचे व जास्त मुदतीचे प्रकार असल्यामुळे आपले गरजेनुसार या योजनेची निवड करावी.
गिल्ट फंड:
या योजनांमध्ये केंद्र व राज्य सरकारी रोखे व ट्रेझरी बिल्स यामध्ये गुंतवणूक केली जाते. या योजनेत कमी मुदतीचे व जास्त मुदतीचे प्रकार असतात.
फायदे:
- क्रेडिट रिस्क अत्यल्प असते.
- जेव्हा व्याजदर वाढण्याची शक्यता असते तेव्हा अल्प मुदतीचे गिल्ट फंड योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे होते.
- जेव्हा व्याजदर कमी होण्याची शक्यता असते तेव्हा मध्यम अथवा दिर्घ मुदतीचे गिल्ट फंड योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे होते.
- उच्च तरलता.
जोखिम:
- व्याज दरातील बदलाचा धोका.
- सरकारी कर्ज रोख्यांच्या किमती जेव्हा कमी होतात तेव्हा अशा योजनेत नुकसान झालेले आहे. यासाठी अशा योजनेत व्याज दरातील बदलाची दखल घेऊनच गुंतवणूक करावी.
- रिझर्व्ह बँकेचे धोरणांचा परिणाम: याचा परिणाम दिर्घ मुदतीसाठी होऊ शकतो. उदा. रिझर्व्ह बँकेने बँक दरात कपात (रिझर्व्ह बँके ज्या दराने बँकाना कर्ज देते) केली असता दिर्घ मुदतीचे सरकारी रोख्यांच्या किंमती कमी होतात व अल्प मुदतीचे सरकारी रोख्यांच्या किंमती थोड्या वाढतात.
बाँड फंड:
यातील गुंतवणूक हि मुख्यत्वेकरून सरकारी कंपन्यांचे कर्ज रोख्यात केली जाते. या कंपन्यांचे कर्ज रोख्यांची सुरक्षीत: खाजगी कंपन्यांचे रोख्यांपेक्षा अधिक असते. अधिक तरलता हा यांचा आणखीन एक महत्वाचा फायदा असतो. या रोख्यातील परतावा हा सरकारी रोख्यांपेक्षा अधिक असतो.
इन्कम फंड:
या प्रकारचे योजनांचे उदिष्ट हे या योजनेच्या नावा प्रमाणेच दर महा अथवा दर तिमाही तत्वावर नियमित उत्पन्न मिळवून देण्याचे असते. मुख्य उद्देश गुंतवणूकदाराला नियमीत व स्थिर उत्पन्न देण्याचा असतो. सर्वसामान्यपणे या प्रकारचे योजनांमधील गुंतवणूक हि ठरावीक उत्पन्न देणा-या पेपरमध्ये उदा. बाँडस्, कॉर्पोरेट डिबेंचर्स, सरकारी कर्ज रोखे आणि मनी मार्केट मध्ये केली जाते. आणि म्हणून या योजनेतून नियमीत परतावा देण्याचा कल असतो. यातील परतावा हा व्याजदराचे बदलावर अवलंबून असतो. मात्र अधिक उत्पन्नासाठी यांतील काही प्रकारचे योजनेत 10% ते 30% एवढी गुंतवणूक हि शेअर बाजारात केली जाते, अर्थात अशा योजनेतील परतावा हा अनियमित स्वरुपात कधी कमी तर कधी जास्त असा मिळतो. या प्रकारच्या योजना अल्प व दिर्घ मुदतीच्या असतात.
फायदे:
- सर्वसाधारणपणे या योजनेतून लिक्वीड व अल्प मुदतीचे योजनांपेंक्षा जास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता असते जास्तकरुन जेव्हा व्याजदर स्थिर असतात तेव्हा.
- जेव्हा व्याजदर कमी होतील अशी अपेक्षा असेल तेव्हा यातील गुंतवणूक हि फायदेशिर होऊ शकते.
जोखिम:
- या योजनांचे एनएव्ही मधील बदल हा मुख्यत्वेकरून देशातील व्याजदरातील बदलांवर अवलंबून असतो. व्याज दर कमी झाला तर एनएव्ही मध्ये वाढ होते व व्याज दर वाढला तर एनएव्ही मध्ये घट होते.
- रिझर्व्ह बँकेचे धोरणांचा परिणाम: याचा परिणाम दिर्घ मुदतीसाठी होऊ शकतो. उदा. रिझर्व्ह बँकेने बँक दरात कपात (रिझर्व्ह बँके ज्या दराने बँकाना कर्ज देते) केली असता दिर्घ मुदतीचे सरकारी रोख्यांच्या किंमती कमी होतात व अल्प मुदतीचे सरकारी रोख्यांच्या किंमती थोड्या वाढतात.
- बहुतेक योजनात निर्गमन आकार आकारला जात असल्याने परतावा कमी होतो, मुख्यत्वे गुंतवणूक अल्प काळासाठी केली असेल तर.
- मर्यादित स्वरूपात क्रेडिट रिस्क असते.
आर्बीटेज फंड
या प्रकारचे योजनेत रोखीचे बाजारातून समभाग खरेदि केले जातात व ते फ्युचर्स मध्ये विकले जातात. हि एक अशी योजना आहे कि ज्यामध्ये रोखीचे बाजारातील व भविष्यातील (Futures) बाजारभावाचे फरकातून परतावा (Returns) मिळविले जातात. यातील एकूण रकमेची गुंतवणूक हि समभाग, डेरिव्हेटीव्ह व रोखे यामध्ये विभागली जाते. मात्र जर भविष्यातील परताव्याची संधी बाजारात नसेल तर जास्त रक्कम हि कमी अथवा दिर्घ कालावधीचे रोख्यात गुंतवली जाते. हा पर्याय कमी तसेच दिर्घ मुदतीचे गुंतवणूकीसाठी चांगला आहे. या प्रकारचे काही योजनांमध्ये गुंतवणूक काढून घेताना ठरावीक कालासाठी निर्गमन आकार आकारला जातो.
या योजनेत गुंतवणूकीचे फायदे:
- गुंतवणूकीसाठी आर्बीटेज पध्दतीचा अवलंब केला जात असल्यामुळे मुद्दल कमी होण्याची जोखीम फारच कमी असते.
- अस्थीर बाजारात या योजनेत चांगला परतावा मिळतो.
- पत व व्याजदरातील बदलांचा परिणाम होत नाही.
- बहुधा या प्रकारच्या योजना या ईक्वीटी योजना गणल्या जात असल्यामुळे याव्दारे मिळणारा डिव्हिडंड हा करमुक्त असतो तसेच एक वर्षापेक्षा गुंतवणूक कालावधी जास्त असल्यास दिर्घ मुदतीचा नफा गणला जात असल्यामुळे करमुक्त परतावा मिळतो.
जोखिम:
- आकर्षक आर्बीटेजच्या संधी वारंवार प्राप्त होत नाहित त्यामुळे अशावेळी योजनेची गुंतवणूक मनी मार्केट मध्ये केली जाते ज्यामुळे परतावा कमी मिळू शकतो.
- सगळ्याच योजना रोजचे रोज पुनर्खरेदिसाठी खुल्या असत नाहित ज्यामुळे तरलता कमी होते. अशा वेळी या योजना डेरिव्हेटिज् चे सौदा पुर्तीचे वेळी पुनर्खरेदिसाठी खुल्या केल्या जातात.
- बहुतेक योजनात निर्गमन आकार आकारला जात असल्याने परतावा कमी होतो.
बंद योजना (Close ended schemes):
निश्र्चित मुदत योजना (FMP – Fixed Maturity Plans):
मुदत ठेवींप्रमाणे एका ठरावीक काळासाठी या योजना असतात. 30 दिवस ते 5 वर्षे एवढ्या कालावधीसाठी यांत गुंतवणूक करता येते. या योजनांचा मुख्य फायदा म्हणजे व्याज दरातील बदलाची जोखिम कमी असते. यातिल परताव्यावर बाजारातील बदलत्या व्याज दरांचा विषेश परिणाम होत नाही कारण अशा योजनेची मुदत निश्र्चित असते व त्या योजनेच्या कालावधी प्रमाणे पेपर्समध्ये गुंतवणूक केली जाते. सेबीचे नियमाप्रमाणे याचा अंदाजीत परतावा जाहिर करता येत नाही. या योजनेत क्रेडिट रिस्क असते कारण दिलेले कर्ज बुडित जाणेची शक्यता असते परंतु चांगला पतदर्जा असलेली गुंतवणूक साधने वापरून हा धोका कमी केला जातो. या योजनांचा महत्वाचा फायदा म्हणजे बँक ठेवीपेंक्षा कमी आयकर दराचा लाभ हा होय.
बँकेचे मुदत ठेवींवरील व्याजाचे उत्पन्नावर लागणारे आयकराचे दरापेंक्षा या योजनेतील गुंतवणूकीवरिल मिळणारे परताव्यावर लागणारे आयकराचा दर कमी असल्यामुळे करोत्तर परतावा जास्त मिळतो. जर 12 महिन्यांपेक्षा अधिक मुदत असेल तर एक वर्षाचे 13 महिने वा अधिक मुदत असल्यास दोन आर्थिक वर्षांचे इंडेक्सेशनचा दिर्घकालीन भांडवली कराचा फायदा मिळतो.
- Published in Debt Funds
होय तुम्हीसुद्धा अब्जोपती बनू शकता
होय तुम्हीसुद्धा अब्जोपती बनू शकता.
या जगात प्रत्येक व्यक्तीचीच श्रीमंत बनण्याची इच्छा असते कोणी ती व्यक्त करतो तर कोणी असे बोलण्यासाठी कचरतो. आज काल महागाई एवढी वाढलेली आहे कि करोडपती होऊनही तुम्ही तुमच्या साऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकत नाही हि वस्तुस्थिती आहे. म्हणूनच आता आपण करोडपती नव्हे तर अब्जोपती कसे बनू शकू याचा विचार केला पाहिजे. परंतु होत काय कि जर आपण मध्यमवर्गीय असलो तर आपल्याला असे स्वप्न पाहण्याची सुद्धा भीती वाटते. हे मुळी अशक्यच आहे असच काहीस आपल्याला वाटत असत. परंतु जरी तुम्ही मध्यम वर्गीय असलात तरी सुद्धा तुम्ही निश्चितच अब्जोपती होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणू शकता. हे कसे शक्य आहे हेच या लेखात आपण पाहणार आहोत.
जर तुमची खरोखर श्रीमंत होण्याची इच्छा असेल व त्यासाठी थोडी काटकसर व नियमित शहाणपणाने गुंतवणूक करण्याची तयारी असेल तर हे निश्चित साध्य होऊ शकते. एक लक्षात घेतले पाहिजे कि आपल्या देशात जे काही अब्जोपती लोक आहेत ते काही एका दिवसात श्रीमंत झालेले नाहीत. त्यासाठी काही पिढ्या त्यांना कष्ट व नियमित व्यवसाय करावा लागलेला आहे. काही व्यक्ती दोन पिढ्यानंतर हे इप्सित साध्य करू शकलेल्या आहेत. फारच थोड्या व्यक्ती हे त्यांच्या जीवनातच अब्जोपती बनण्यात यशस्वी झालेल्या आहेत. आपण सुद्धा जर असा विचार केला कि ठीक आहे मी शक्यतो याच जन्मात अब्जोपती होण्याचा प्रयत्न करीन पण जर का ते नाही जमलं तर माझ कुटुंब पुढील पिढीत तरी अब्जोपती झालेलं असेलच हा विचार आपल्याला केला पाहिजे.
म्युचुअल फंड हे सर्वसामान्य लोकांसाठी गुंतवणूकिचे एक सर्वोत्तम माध्यम आहे. यातील इक्विटी स्कीम्स मधील गुंतवणूक ही शेअर बाजारात केली जाते. आपल्यापैकी बरेच जणांचे असे गैर समज असतात कि शेअर बाजार म्हणजे जुगार, हा जणूकाही आपल्यासाठी नाहीच. खर म्हणजे शेअर बाजार हाच संपत्ती निर्माण करण्यासाठी एक सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय आहे. परंतु शेअर बाजारात ट्रेडिंग अथवा गुंतवणूक करण्यासाठी त्याचे ज्ञान असणे आवश्यक असते मात्र ते सर्वांकडे असू शकत नाही व आपल्या नोकरी धंद्यातून तेवढा वेळ काढणेही सर्वांनाच शक्य होत हि नाही, हि वस्तुस्थिती आहे. अशा लोकांसाठीच तर म्युचुअल फंड आहे ना. कारण म्युचुअल फंड योजनांचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांच्याकडे तज्ञ असा फंड मॅनेजर असतो ज्याला सहाय्य करण्यासाठी रिसर्च टीम असते जी शेअर बाजारातील घडामोडींचा बारकाईने अभ्यास करून आपला रिपोर्ट फंड मॅनेजरला देत असते, त्याच्यावर विचार करून फंड मॅनेजर शेअर बाजारात कोणत्या कंपनीचे शेअर्स कधी व किती प्रमाणात व किती काळासाठी विकत घ्यावयाचे किंवा योजनेच्या पोर्टफोलिओ मध्ये असणारे कोणते शेअर्स सध्या विकावयाचे याचा निर्णय वेळोवेळी घेत असतो. काही कंपन्याच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आवश्यकता असल्यास टीम त्या कंपनीला भेट देऊन कंपनीची अधिक माहिती जमा करते. यासाठी कंपनीचे फंडामेंटल विश्लेषण केले जाते, भविष्यात त्या कंपनीला किती ऑर्डर्स मिळणार आहेत त्यातून किती नफा होऊ शकेल आदी सर्व गोष्टींचा विचार गुंतवणुकीचा निर्णय करण्यापूर्वी केला जातो. यामुळे भविष्यात त्या कंपनीच्या शेअरचा भाव किती प्रमाणात वाढू शकेल याचाही विचार केला जातो. या सर्व प्रक्रियेनंतरच प्रत्यक्ष गुंतवणूक कंपनीच्या शेअर्स मध्ये योग्य त्या प्रमाणात केली जाते. याशिवाय एका कंपनीत किती प्रमाणात गुंतवणूक करावयाची यासाठी काही नियम असतात त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते. एखाद्या योजनेतील गुंतवणूक शेअर बाजारात किती प्रमाणात करावयाची किती प्रमाणात कर्जरोख्यात करावयाची याबाबत योजना जाहीर करण्यापूर्वीच ते जाहीर केले जाते व याचे पालन होते आहे कि नाही हे ए.एम.सी. व सेबी मार्फत वेळोवेळी तपासले जाते. कोणकोणत्या शेअर्स मध्ये व किती प्रमाणात गुंतवणूक करावयाची याचेही नियम ठरलेले असतात व त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते. या सर्वच गोष्टींमुळे शेअर बाजारातील गुंतवणुकीची जोखीम म्युचुअल फंडात कमी होते. आपल्याला माहित असेलच जगात व आपल्या देशातही शेअर बाजाराला गेल्या २०० वर्षांपेक्षा जास्त काळाचा इतिहास आहे व असे दिसून आलेले आहे कि शेअर बाजारात दीर्घ मुद्तीत नेहमीच फायदा होतो. असे सिद्ध झालेले आहे कि कोणत्याही ५० वर्षात शेअर बाजारातील गुंतवणुकीवर सरासरी १२०००% एवढा प्रचंड नफा जगात सर्वत्रच झालेला आहे. म्हणूनच जगातील महान गुंतवणूक गुरु वॉरेन बफे असे सांगतो कि जेव्हा तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करता तेव्हा वर्षांचा नव्हे तर ४ ते ५ दशकांचाच विचार केला पाहिजे.
हे सत्य आहे कि शेअर बाजारात नेहमीच चढ उतार होतच असतात व यामुळे जर अल्पकाळाचा विचार केला तर शेअर बाजारात नफा किंवा नुकसान जास्त प्रमणात होण्याची शक्यता असते मात्र जर आपले उदिष्ट २० किंवा अधिक वर्षांचे असेल तर नेहमीच शेअर बाजारातील गुंतवणुकीतून फायदाच होत असतो आणि म्हणूनच शेअर बाजारातील चढ उतार हि जोखीम न समजता एक उत्तम संधी म्हणूनच पाहिले पाहिजे. म्युचुअल फंडाच्या अनेक चांगल्या योजनेतून गेल्या वीस वर्षात सरासरी २०% ते २५% वार्षिक चक्रवाढ पद्धतीने गुंतवणुकीवर परतावा मिळालेला आहे. आता हेच पहाना आपला सेन्सेक्स १९७९ साली सुरु झाला तेव्हा तो १०० होता आता तो ३२७०० च्या आसपास आहे, म्हणजेच सरासरी वार्षिक १८% चक्रवाढ पद्धतीने उत्पन्न सेन्सेक्सने गेल्या ३८वर्षात दिलेले आहे, व म्युचुअल फंडाने तर याहून जास्त दिलेले आहे कारण त्यांनी ते तसे दिले तरच त्या फंड मॅनेजरची हुशारी मानली जाते.
म्युचुअल फंडाच्या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी फार मोठी रक्कमही लागत नाही. दर महा अगदी रु.१००० पासून कितीही रक्कम गुंतवता येते. ज्यांनी गेले २० वर्षे नियमित दर महा रु.१००० काही चांगल्या योजनेत एस.आय.पी. माध्यमातून गुंतवलेले आहेत त्यांचे आजपर्यंत रु.२.४० लाख रक्कम गुंत्वावून झाली व आज त्याचे मूल्य रु.४५ लाख ते ५० लाख एवढे झालेले आहे.
आता असा विचार केला पाहिजे कि म्युचुअल फंडात दीर्घकाळ व नियमितपणे दरमहिना गुंतवणूक करण्याची माझी तयारी असेल तर मला भविष्यात चक्रवाढ पद्धतीने सरासरी किती उत्पन्न वार्षिक मिळू शकेल व यासाठी काही गणितीय सूत्र आहे काय? होय असे ढोबळमानाने सांगता येते कि देशाचा जो जी.डी.पी. (ठोकळ उत्पनाचा दर) असतो त्यात जर आपण वार्षिक महागाईचा दर मिळवला तर जेवढी संख्या येईल तेवढे किमान उत्पन्न गुंतवणूकदाराला म्युचुअल फंडातून मिळाले पाहिजे. जेव्हा आर्थिक प्रगती कमी असते तेव्हा जी.डी.पी. कमी असतो व महागाईचा दर जास्त असतो व जेव्हा देशाचा आर्थिक विकासाचा दर वाढू लागतो तेव्हा महागाईचा दर कमी होतो. सध्या आपल्या देशात जी.डी.पी. चा दर सरासरी ६% आहे व महागाईचा दर आहे ५% म्हणजेच तुम्हाला म्युचुअल फंडाच्या डायव्हरसिफाइड इक्वीटी योजनेतून वार्षिक किमान ११% पेक्षा जास्त जास्त उत्पन्न वार्षिक चक्रवाढ पद्धतीने मिळू शकेल, मागील इतिहास पाहता ते सरासरी १५% दराने मिळू शकेल. बहुतांशी हे तुम्हाला जास्तच मिळणार आहे पण १५% हे सुद्धा काही कमी नाही कारण बँकेत तुम्हाला ७% एवढेच व्याज मिळत असते, त्यातूनही महागाई व कर वजा केला तर निव्वळ आपले पैसे सुरक्षीत ठेवण्यासाठीच आपण बँकेत पैसे ठेवत असतो.
आता जर तुम्हाला अब्जोपती बनवायचे असेल तर दर महिना किती रक्कम गुंतवली पाहिजे व ती किती काळासाठी गुंतवली पाहिजे हे पाहूया. आता जर कर का तुम्ही दर महा फक्त रु.१००० गुंतवणार असाल व मिळणारा चक्रवाढ व्याजाचा वार्षिक दर १५% गृहीत धरला तर तुम्हाला ६३ वर्षे नियमित दर महा रु.१००० ची गुंतवणूक केली पाहिजे म्हणजे तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य रु.१०० कोटी म्हणजेच एक अब्ज एवढे होईल. पण हेच जर का तुम्ही दर महा रु.१०००० ची गुंतवणूक केली तर ४८ वर्षात तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य रु.१०० कोटी (एक अब्ज) होईल. आता हा काळ कमी करण्यासाठी काय केले पाहिजे? सुमारे ५० वर्षापूर्वी एखादी व्यक्ती जेव्हा नवीन नोकरीला लागायची तेव्हा त्याचा सुरुवातीचा पगार असायचा सुमारे रु.१२५/- दर महा, तेच जर आज पाहिले तर सुरुवातीचा पगार असतो साधारण रु.२५००० महिना. याचे कारण दर वर्षीच महागाई वाढत असते व त्यामुळे चलनाची किंमत कमी होते तर त्यामुळे दर वर्षीच पगार किंवा आपले उत्पन्न सरासरी १०% ते २०% वाढत असते आणि म्हणूनच गुंतवणूक करतानासुद्धा आपण दर वर्षी आपल्या गुंतवणुकीत वाढ केलीच पाहिजे, ती किती करावी तर किमान दर वर्षी १०% दराने केली पाहिजी. आता असे केले तर काय होईल ते पहा. जर का वरील उदाहरणात दर महा रु.१००० वार्षिक १०% वाढ करीत गुंतवले तर ५७ वर्षात रु.१०० कोटी होतील किंवा दर महा रु.१०००० वार्षिक १०% वाढ करीत गुंतवले तर ४२ वर्षात रु.१०० कोटी होतील.
मागील २५ वर्षात म्युचुअल फंडाच्या डायव्हरसिफाइड इक्वीटी योजनेत एस.आय.पी. माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक चक्रवाढ पद्धतीने मिळालेला परतावा सरासरी २३% एवढा आहे म्हणूनच खालील तक्त्यामध्ये, रु.१०० कोटी होण्यासाठी वार्षिक १०% दराने एस.आय.पी. मध्ये वाढ केल्यास वार्षिक १५% व वार्षिक २०% दराने परतावा मिळाल्यास किती वर्षे लागतील त्याचे गणित दिलेले आहे. याच बरोबर एक लक्षात ठेवले पाहिजे कि प्रत्येक वर्षीच महागाई काही प्रमाणात वाढतच असते व ज्यामुळे रुपयाची खरेदीची क्षमता कमी होत असते म्हणूनच मुदतीअखेर, वार्षिक ५% टक्के दराने महागाई वाढल्यास, रु.१०० कोटी रुपयांचे खरे मूल्य किती असेल ते हि दिले आहे. जर का तुम्हाला/तुमच्या कुटुंबाला अब्जोपती बनावयाचे असेल तर खालील तक्ता तुम्हाला गुंतवणुकीचे नियोजन करण्यास उपयुक्त होऊ शकेल. जर का आपल्या कुटुंबात एका पेक्षा जास्त व्यक्ती मिळवत्या असतील तर हे उदिष्ट लवकर साध्य करता येऊ शकेल, कारण तुम्ही जास्त रकमेची नियमितपणे गुंतवणूक करू शकाल.
जर का तुम्ही आज ३० वर्षाचे असाल तर तुमच्या मनात असे येऊ शकते कि, मी सतत काटकसर करून नियमितपणे गुंतवणूक करत रहावयाचे व अजून ४० वर्षांनी जर का मी अब्जोपती होणार असेन तर त्याचा मला काय फायदा कारण तेव्हा मी असेन ७० वर्षांचा,पण एक लक्षात घ्या हाच विचार जर ज्या आपल्या पूर्वजांनी केला असता तर त्यांनी कधीच माणगावी नारळाचे झाड कधीच लावले नसते कारण ते फळधारणा करण्यासाठी १५ ते २० वर्षे घेते, पण त्यांनी हा विचार न करता कृती केल्यामुळेच आपण आज अशी अनेक फळ आपण खात आहोत. तुम्ही जर असे केलेत तर तुमच्या म्हातारपणी तरी तुमची कदाचित सारी स्वप्न पूर्ण होऊ शकतील, किंवा तुमची पुढील पिढी तरी आर्थिक चिंतामुक्त जीवन जगू शकेल. कारण प्रत्येकाचीच एक इच्छा असते कि आपल एक चांगल घर असावे, गाडी असावी व आर्थिक चिंता मुक्त जीवन असावे हे तुमच्या बाबत किंवा तुमच्या पुढच्या पिढीला तरी भाग्य लाभेल.
म्युचुअल फंडात दर महा एस.आय.पी. रु. | वार्षिक १०% एस.आय.पी. मध्ये वाढ केली तर १०० कोटी रुपये मूल्य होण्यास लागणारी वर्षे (परतावा १५%) | वार्षिक ५% महागाईचा दर वजा केल्यावर १०० कोटी रुपयांचे मुदती अखेर खरे मूल्य कोटी रुपये | वार्षिक १०% एस.आय.पी. मध्ये वाढ केली तर १०० कोटी रुपये मूल्य होण्यास लागणारी वर्षे (परतावा २०%) | वार्षिक ५% महागाईचा दर वजा केल्यावर १०० कोटी रुपयांचे मुदती अखेर खरे मूल्य कोटी रुपये |
१००० | ५७ | ५.९० | ५० | ८.७२ |
५००० | ५० | ८.७२ | ४१ | १३.५२ |
१०००० | ४५ | ११.१३ | ३८ | १५.६६ |
१५००० | ४२ | १२.८८ | ३५ | १८.१३ |
२०००० | ४० | १४.२० | ३४ | १९.०४ |
२५००० | ३९ | १४.९१ | ३२ | २०.९८ |
३०००० | ३८ | १५.६६ | ३१ | २२.०४ |
४०००० | ३६ | १७.२६ | ३० | २३.१३ |
५०००० | ३४ | १९.०३ | २९ | २४.२९ |
६०००० | ३३ | १९.९८ | २८ | २५.५० |
१००००० | २८ | ४५.८१ | २५ | ५०.५० |
- Published in Articles
अनिवाशी भारतीय NRI’s व म्युचल फंड
अनिवाशी भारतीय NRI’s व म्युचल फंड गुंतवणूक
अनिवाशी भारतीयांची म्युचल फंडातिल गुंतवणूक नियमितपणे वाढत आहेः
भारताचे आर्थिक विकासात भारतात रहाणारे भारतीय नागरिकांचा सहभाग तर आहेच पण परदेशात रहाणारे भारतीयांचा सुध्दा यात भरीवं वाटा आहे. म्युचल फंडात परदेशात रहाणारे भारतीयांची गुंतवणूक नियमितपणे वाढतच आहे. रिझर्व्ह बॅकेने जाहिर केलेल्या तपशिलानुसार परदेशी रहाणारे भारतीयांची म्युचल फंडातिल गुंतवणूक २००३ साली रु.१०२८ कोटी होती ती २००४ साली रु.२६६३ कोटी झाली व २००५ साली रु.४९६६ कोटी झाली.
परदेशी रहाणारे भारतीयांनी म्युचल फंडात गुंतवणूक का करावी?
- भारतीय अर्थव्यवस्था हि जगात अत्यंत वेगाने पुढे जात आहे हे सर्वमान्य सत्य आहे.
- परकिय गुंतवणूकदार नियमितपणे भारतिय अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करित आहेत.
- अनेक सेझ मंजूर झाले आहेत व भविष्यात ते कार्यरत होतिल.
- येत्या ५ ते ७ वर्षात पायाभूत सुविधा विभागात जसे की पॉवर, रस्ते, धरणे, पाणी योजना, टेलिकम्युनिकेशन इ अनेक उद्योग धंद्यात मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक करण्याचे सरकारी व योजना आयोगाचे निर्णय झाले आहेत.
- सर्वच विभागात उद्योग धंद्याना पोषक वातावरण आहे.
- जीडिपी स्थीर आहे व पूढे वाढ अपेक्षीत आहे.
- काम करणा-या भारतीयांचे सरासरी वय फक्त ३५ आहे.
- सद्या देशातील एकूण गुंतवणुकीपैकी नगण्य म्हणजे 7 टक्के पेक्षा कमी गुंतवणूक म्युचल फंडात आहे.
- उद्योगधंद्याला पूरक असे सरकारी धोरण आहे.
- शेती व शेतीला पूरक उद्योगधंद्याला पूरक असे सरकारी धोरण आहे.
- अनेक परदेशी कंपन्यांचे काम भारतीय कंपन्या करत आहेत.
- भारतीय शेअर बाजार अद्यावत आहे व त्यावर उत्तम नियंत्रक म्हणून सेबी व रिझर्व्ह बॅंक काम करत आहेत.
- भारतीय अर्थसंस्था व उद्योगधंद्यावर उत्तम नियंत्रक म्हणून सेबी व रिझर्व्ह बॅंक काम करत आहेत.
अनिवाशी भारतीय म्हणजे कोण?
भारतिय नागरिक किंवा भारतिय वंशाच्या व्यक्ति जे परदेशात शिक्षण नोकरी किंवा धंद्यासाठी रहातात त्याना परदेशस्थ भारतीय म्हणून ओळखले जाते.
अनिवाशी भारतीय म्युचल फंडात गुंतवणूक करु शकतात काय?
होय करु शकतात.
अनिवाशी भारतीय म्युचल फंडात गुंतवणूक कशी करु शकतात?
भारतीय म्युचल फंडात गुंतवणूक करण्यासाठी परदेशी भारतीयाना खालिल तीन प्रकारातील कोणत्याहि एका प्रकारचे खाते, ज्या बॅंका अशी सुविधा पुरवतात अशा कोणत्याही बॅंकेत, खाते उघडावे लागतेः
- नॉन रेसिडंट (एक्स्टर्नल) रुपी (एनआरइ) खाते ज्यात भारतीय रुपयात तसेच परदेशी चलनातही पैसे भरता येतात व काढताही येतात व परदेशात नेताही येतात.
- आर्डिनरि नॉन रेसिडंट रुपी (एनआरओ) खाते ज्यात भारतीय रुपयात तसेच परदेशी चलनातही पैसे भरता येतात मात्र परदेशी चलनात काढता येत नाहित व परदेशात नेताही येत नाहीत.
- फूल्ली कन्वर्टीबल नॉन रुपी (एफएनसीआर) खाते हे एनआरइ खात्यासारखेच असते मात्र यातील शिल्लक हि परदेशी चलनातच खात्यात शिल्लक रहाते.< >एनआरइ खात्यावरिल चेक द्वारा रुपयांमधे किंवा अमेरिकन डॉलरमधे त्यावेळच्या विनिमय दरानुसार अदा केले जातात रिझर्व्ह बॅंकेच्या नियमाअधीन जर गुंतणूक परदेशी चलनात परत नेण्याचे सुचनेनुसार गुंतविली असेल तरच अमेरिकन डॉलरमधे पैसे परत केले जातात. जर गुंतवणूक एनआरओ खात्यातून केली असेल तर एनआरओ खात्यावरिल भारतीय रुपयात रक्कम परत केली जाते. पैसे परत करताना टिडिएस वजा करुन सर्टिफिकेट सोबत परत केले जातात. परदेशी चलनात पैसे नेण्याच्या सुविधेने गुंतवणूक केली असेल तर ३०% कॅपिटल गेन टॅक्स वजा केलेली रक्कम नेता येते.
- तसेच परदेशी चलनात पैसे नेण्याच्या सुविधेने गुंतवणूक केली असेल तर टॅक्स पश्चात डिव्हीडंडची रक्कमही नेता येते.
अनिवाशी भारतीयाना म्युचल फंडात गुंतवणूक करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेची परवानगी घेणे आवश्यक आहे का?
बहूतेक भारतिय म्युचल फंड कंपन्यानी त्यांचे योजनेमधे परदेशात रहाणारे भारतीयांनी गुंतवणूक करण्यासाठी आधीच रिझर्व्ह बॅंकेची परवानगी घेवुन ठेवलेली असल्यामुळे अशी परवानगी त्या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी घ्यावी लागत नाही.
परदेशी चलनात अशी गुंतवणूक करता येते काय?
नाही. भारतीय रुपयातच करावी लागते. एनआरइ खात्यातून अशी गुंतवणूक करणे उत्तम असते.
पैसे कसे काढता येतात?
ओपन-एंडेड स्किममधून पैसे काढण्यासाठी रिडमशन स्लीप एक तर सही करुन आमचेकडे पाठवा अथवा म्युचल फंड कंपनीचे इंव्हेस्टर सर्व्हिस सेंटर कडे पाठवावी. सामान्यतः रिडमशन स्लीप मिळाल्या पासून ३ त ५ दिवसात चेक पाठविले जातात.
क्लोज-एंडेड स्किम असल्यास रिडमशन स्लीप नोंदणीकॄत स्टॉक एक्सचेंज वर विकावी लागते.
काढलेले पैसे कोणत्या स्वरुपात अदा केले जातात?
परदेशी चलनात पैसे नेता येतात काय?
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान मधे गुंतवणूक करता येते काय?
होय करता येते.
गुंतवणूकीचे मुल्य कसे समजेल?
आमचे साइटवर लॉगीन करुन समजेल. तसेच www.amfiindia.com वर रोजचेरोज NAV जाहिर केली जाते.
टॅक्स बाबत
नातेवाईकाना युनिटस् बक्षीस देता येतात काय?
होय
इंडेक्सशेसन फायदा मिळतो काय?
होय. जर गुंतवणूक ३६ महिन्यांपेक्षा जास्त काळ ठेवली असेल तर.
शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स किती आहे?
व्यक्तिला कर रचने प्रमाणे.
या लेखाचे खाली दिलेले टेबल पहा.
अधिक जाणकारिसाठी तुमच्या कर सल्लागाराशी बोला.
गुंतवणूकीचे साधे नियमगुंतवणूक म्हटले म्हणजे काही तरी किचकट प्रकार आहे असा समज आपण उगाचच करुन घेतो. साधे व सोपे नियम पाळले तर हिच गोष्ट फारच सोपी आहे हे समजून येईल. साधी गोष्ट हि आहे कि गुंतवणूकीचे साधे व सोपे नियम पाळून कोणतीही व्यक्ती चांगला गुंतवणूकदार होऊ शकते, ज्यामुळे मोठ्या चुकासुध्दा टाळता येतात. येथे मी तुम्हाला यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठीचे साधे व सोपे नियम सांगणार आहे.प्रथमत: प्लान तयार करा:प्रथमतः तुमच्या जोखीम घेण्याच्या तयारीनुसारच तुमच्या गुंतवणुकीचे नियोजन करा. गुंतवलेल्या रकमेपैकी जी रक्कम तुम्हाला पुढील २ ते ३ वर्षात लागणार असेल अशी रक्कम म्युच्युअल फंडाच्या लिक्वीड, मनी मार्केट,फ्लोटींग इंटरेस्ट रेट अथवा अल्प मुदतीच्या बॉण्ड मध्ये गुंतवा. जर तुम्ही या पुर्वी अल्प मुदतीच्या उदिष्टांकरीताची गुंतवणूक जास्त जोखमीच्या योजनेत केलेली असेल व जर ती फायद्यात असेल तर अथवा तीफायद्यात येताच रक्कम काढून घ्या व वर सांगितलेल्या योजनेपैकी योग्य त्या योजनेत गुंतवा. हे सांगावयाची गरज नाही कि बाजाराचा निचांक काय असेल अथवा उच्चांक काय असणार आहे याचे ठोकताळे बांधत बसू नका. प्रथमत: हे लक्षात ठेवा कि अल्प मुदतीच्या उदिष्टांकरीताची रक्कम सुरक्षीत ठेवण्याला प्राधान्य द्या. तुमच्या दिर्घ मुदतीच्या उदिष्टांसाठी म्युच्युअल फंडाच्या समभाग योजनेतच गुंतवणूक करा. यासाठी, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टी कॅप, संतुलित (Balanced Schemes and Balanced Advantage Fund) व इक्विटी सेव्हिंग्ज स्कीम अशा प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत, योग्य योजनेची निवड करण्यासाठी तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या. म्युचुअल फंड किंवा शेअरबाजारात गुंतवणूक करतना नेहमीच गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला महत्वपूर्ण असतो कारण तो त्याच्या अनुभवाचा वापर करून तुम्हाला सल्ला देत असतो.साधी गोष्ट:दिर्घ मुदतीच्या उदिष्टांसाठी समभाग योजनेतच गुंतवणूक करा व त्यासाठी डायव्हर्सीफाईड इक्वीटी योजनेची (शक्यतो लार्ज कँप किंवा लार्ज अँड मिड कँप फंड योजना) निवड करा. अल्प मुदतीच्या उदिष्टांकरीताची रक्कम फ्लोटींग रेट बॉण्ड फंड योजनेत गुंतवा. हे गुंतवणूकीचे मुळ नियम आहेत ते काटेकोरपणे पाळणेच तुमच्या हिताचे असते. तुमच्यासमोर गुंतवणूकीचे बरेच काही पर्याय उपलब्ध आहेत अथवा ते तुम्हाला सांगीतले जातील, जसे कि पेट्रो फंड, एमएनसी फंड, गिल्ट इ. स्पेशँलीटी अथवा सेक्टोरल फंडाच्या योजना असतात व त्यात गैर कहिही नाही. परंतु नविन गुंतवणूकदाराने चांगल्या म्युच्युअल फंड हाऊसच्या डायव्हर्सीफाईड इक्वीटी योजनेतच गुंतवणूक करण्याचा साधा नियम पाळावा. दिर्घ मुदतीत अशा योजना अत्यंत फायदेशीर होतात. जर एखाद्या तिमाहीत २५% पेक्षा जास्त नुकसान सहन करण्याची तुमची तयारी नसेल तर स्पेशँलीटी अथवा सेक्टोरल फंडाच्या योजनांपासून दुर रहाणेच शहाणपणाचे असते.हॉट स्टॉक व फंड योजना टाळा:जर तुम्ही या वर्षातील सर्वात चांगली कामगिरी करणा-या म्युच्युअल फंड योजनेत व समभागात गुंतवणूक केली असेल तर पुढिल वर्षी त्याच्या निचांकी कामगिरीची तयारी ठेवा. कारण साधा नियम लक्षात ठेवा ज्या गोष्टीची किंमत वर जाते ती खाली येणारच. यासाठीच Reversion to the Mean (परत मध्य गाठलाच जातो) हा नियम आहे.नियमित गुंतवणूक करत रहा:आपल्या गुंतवणूक करण्याच्या क्षमतेनुसार कमी अथवा जास्त रक्कम दर महा ठरावीक तारखेला गुंतवत रहाणे हाच जोखीम कमी करण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे, कारण बाजार उच्चांकी असताना गुंतवणूक करण्याचे या प्रकारेच टाळू शकता. शिवाय अशी सर्वकालीन शहाणी व हुशार व्यक्ती शोधूनही सापडणार नाही कि जी बाजाराचा कल, तेजीचा किंवा मंदीचा कालावधी (timing) बरोबर साधू शकेल.गुंतवणूक करा पण विकू नका:अल्प काळासाठी (वरचेवर) केलेले व्यवहार (trading) हे गुंतवणूकदारापेंक्षा फक्त ब्रोकरलाच श्रीमंत करतात. तसेच हि प्रवृत्ती आयकर विभागालाही आवडते. जर तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला भेटलात, कि जो असे सांगतो आहे कि मी अल्प काळाचे व्यवहार (trading) करुन भरपूर पैसे मिळवले आहेत, व तुम्ही याबाबत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलात तर मनाची तयारी ठेवा कि लवकरच तो या विषयावार बोलण्याचे टाळून दुस-याच एखाद्या विषयाला महत्व देऊ लागेल व ते तुम्हाला ऐकून घ्यावे लागेल. म्हणून साधा नियम पाळा कि फंडात अथवा स्टॉक मध्ये नियमीत गुंतवणूक करत रहा व ती विसरुन जा. यालाच म्हणतात Buy and Hold.टिपवर विश्वास ठेवून गुंतवणूक करु नका:कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणत्यातरी योजनेत गुंतवणूक करू नका. अनुभवी गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याप्रमाणेच गुंतवणूक कारणे तुम्हाला फायदेशीर होईल.जास्त व्याजाच्या मोहाला बळी पडू नका:जास्त व्याचाचे आमिष आहे म्हणून सहकारी पतसंस्था वगैरे ठिकाणी गुंतवणूक करू नका, कारण यातील एखादा संचालक जरी लबाडी करणारा निघाला तरी अशी संस्था बुडू शकते व तुमचे पैसेही बुडण्याची शक्यता असते.MLM, भीशी, चीट फंड इ. योजनांपासून दूर रहा:अशाप्रकारच्या योजनेतून फक्त सुरुवातीच्या लोकांनाच फायदा मिळतो व नंतर सामील होणाऱ्या सर्वच लोकांना नुकसान सोसावे लागते म्हणून अशा योजना जरी तुमचा जवळचा मित्र किंवा अगदी नातेवाईक घेऊन आला तरी त्याला नाही म्हणायला शिका हाच भविष्यात होणाऱ्या नुकसानीला टाळण्याचा एकच मार्ग आहे. एक लक्षात ठेवा जगात अशी कोणतीही योजना नसते कि जी तुम्हाला अल्प काळात श्रीमंत बनवू शकेल.शेअर बाजारातील डे-ट्रेडिंग, वायदेबाजार, कमोडीटी ट्रेडिंग आदी मोहांपासून दूर रहा.डे-ट्रेडिंग, वायदेबाजार, कमोडीटी ट्रेडिंग यातून झटपट पैसे मिळवण्याचे आमिष दाखवले जाते पण एक लक्षात ठेवा कि हा एक प्रकारचा सरकारमान्य जुगारच आहे व जुगार खेळून कोणीही श्रीमंत होऊ शकत नाही, जुगार चालवणारा मात्र श्रीमंत होतो हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. डे-ट्रेडिंग, वायदेबाजार, कमोडीटी ट्रेडिंग यातून कधीतरी अल्प काळात भरपूर फायदा होऊ शकतो मात्र तो एकदा का मिळाला कि याचे एकप्रकारे व्यसनच लागते, जे सुटता सुटत नाही व मग यात मिळालेला फायदा तर जातोच परत मुद्दलहि जाते, येथे लाखाचे बारा हजार होणे हि म्हण तंतोतंत लागू पडते.लवकर सुरुवात करा:एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कि शेअर बाजारातून फक्त दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारालाच उत्तम प्रकारचा फायदा हमखासपणे मिळत असतो म्हणून गुंतवणूकदार व्हा, ट्रेडर होऊ नका. सर्वसामान्य माणसासाठी म्युचुअल फंड हे शेअरबाजारात गुंतवणूक करण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे.शेअरबाजारात गुंतवणूक करण्यासाठी वेळ महत्वाची नसून तुम्ही किती काळ नियमीत गुंतवणूक करत रहाता हे महत्वाचे असते. नियमितपणे गुंतवणूक केल्यामुळे सरासरीचा फायदा होतो. चक्रवाढीची ताकद हि एक जादूच आहे असे समजा, यामुळे तुम्ही गुंतवलेली रक्कम दीर्घ काळानंतर अत्यंत वेगाने वाढू लागते हे लक्षात ठेवा. म्युच्युअल फंडाच्या समभाग योजनेतील गुंतवणूक हि नियमीतपणे व दिर्घ मुदतीसाठीच करत रहावयास हवी. गुंतवणूक करतानाच काळजी घ्या, तुमची उदिष्ठ लक्षात ठेवा, तुमच्या जोखीम स्विकारण्याच्या क्षमतेचे पुन:रअवलोकन करा, आणि महत्वाचे म्हणजे रोजच्या रोज शेअर बाजारावर केल्या जाणा-या टीका टिपणीला फार महत्व देऊ नका. तुमच्या भावना काबूत ठेवावयास शिकले पाहिजे. तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे त्यावर ठाम रहा. म्हणूनच जर तुम्ही अजून गुंतवणूकीला सुरुवात केली नसेल तर लगेचच वेळ फुकट न घालवता सुरुवात करा. |
विमा हि गुंतवणूक नाही:
एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे कि जीवन विमा व गुंतवणूक हे पूर्णतः स्वतंत्र विषय आहेत याची गल्लत करू नका. विमा अत्यावश्यकच आहे परंतु तो गुंतवणूक म्हणून समजू नका. विमा फक्त टर्म इन्शुरन्स या प्रकारचाच घेतला पाहिजे.
देशात विमा व्यवसायाचे खाजगीकरण झाल्यापासून अनेक विमा कंपन्या अस्तित्वात आल्या असून त्यांनी जागोजागी त्यांच्या शाखा उघडलेल्या आहेत. सर्वच विमा कंपन्यांनी युनिट लिंक्ड इन्शुअरन्स प्लॅन अर्थात युलिप हे प्रॉडक्ट बाजारात आणलेलीआहेत. अशी केलेली गुंतवणूक किमान ५ वर्ष पुर्ण झाल्याशिवाय काढता येत नाही, तसेच दर वर्षी किमान ५ वर्ष हप्ते भरावे लागतात. असेच अशा योजनेत अनेक प्रकारचे चार्जेस असतात ते समजून घेतलेत तर तुम्ही यात कधीही गुंतवणूक करणार नाही. कारण हे चार्जेस सारा फायदा खाऊन टाकतात. यातील चार्जेसवसुलीसाठी तुमची युनिट्स कमी होतात.
म्युच्युअल फंडात मात्र केव्हाही गुंतवणूक करता येते व केव्हाही काढता येते. तसेच गुंतवलेली संपूर्ण रक्कम गुंतवली जाते. यातील सर्वमिळून चार्जेस हे २.५% पेक्षा जास्त नसतात. युनिट्स पैसे काढल्याशिवाय कधीही कमी होत नाहीत. गरजेचेवेळी ५ दिवसात खात्यात पैसे जमा होतात. फक्त फायद्यात असताना गुंतवणूक काढण्याचे पथ्थ पाळणे हिताचे असते.
जर आपला अकाली मृत्यू झाला तर आपल्या पश्चात आपल्या प्रियजनांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विमा हा प्रत्येकालाच अत्यावश्यक आहे. मात्र तो टर्म इन्शुअरन्स स्वरूपात घेणे हे फायदेशीर असते. टर्म इन्शुअरन्समध्ये ३० वर्षे वयाच्या व्यक्तीला वार्षिक रु.७५०० मध्ये रु.५० लाखाचा विमा मिळतो. असा टर्म इन्शुअरन्स घेऊन बाकी रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवणे हेच ग्राहकाच्या हिताचे असते. म्युच्युअल फंड व टर्म इंशुरन्स चे एकत्रीकरण करुन विमा संरक्षण व गुंतवणूक वृध्दी असे उदिष्ट साध्य करता येऊ शकते व तेच फायदेशीर असते.
कोणतीही गुंतवणूक जर दीर्घ काळासाठी केली तर चक्रवाढ पद्धतीने मिळणाऱ्या व्याजाचा जास्तीत जास्त फायदा मिळतो. म्युचुअल फंडाच्या अनेक योजनांनी गेल्या २५ वर्षात सरासरी २०% पेक्षा जास्त परतावा मिळवून दिलेला आहे, म्हणूनच काही योजनेत १९९५/९६ सालात ज्यांनी रु.१ लाख रुपयांची गुंतवणूक केलेली होती त्या गुंतवणुकीचे आजचे मूल्य रु.५० लाख ते रु.१ कोटी ३५ लाख इतके झालेले आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी गेले २५ वर्षे नियमित दर महा रु.५००० एस.आय.पी. माध्यमातून गुंतवलेले आहेत त्यांची आजपर्यंत एकूण गुंतवणूक रु.१५ लाख इतकी झालेली आहे मात्र त्या गुंतवणुकीचे आजचे मूल्य सुमारे रु.३ कोटी ५० लाख इतके झालेले आहे. म्हणून गुंतवणूक करताना दीर्घ कालीनच विचार केला पाहिजे. बाजारात तेजी नंतर मंदी व मंदी नंतर परत तेजी हि आवर्तने चालूच असतात. मात्र शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीत दीर्घ काळात तेजी मंदीवर मात करून उत्तम परतावा देण्याची ताकद असते हे लक्षात ठेवले पाहिजे.
तुम्हाला जर आयकर कलम ८०-सी चा फायदा मिळण्यासाठी गुंतवणूक करावयाची असेल तर जीवन विमा, ५ वर्षांची बँक ठेव, पी.पी.एफ. याचेपेक्षा म्युचुअल फंडाच्या Equity Savings Schemes चा आपण विचार केला पाहिजे कारण यातून जास्त परतावा तर मिळतोच परत तीन वर्षे पूर्ण झाल्यावर पैसे काढण्याची सुविधासुद्धा उपलब्ध असते.
- Published in About Mutual Fund
विमा ही गुंतवणूक नाही.
विमा ही गुंतवणूक नाही.
जीवन-विमा हा प्रत्येकाच्या आर्थिक नियोजनातील एक महत्वाचा घटक आहे. परंतु ब-याच व्यक्ती विमा पॉलीसी घेणे म्हणजेचगुंतवणूक करणे असा गैरसमज करुन घेत असतात.
मला हल्लीच एक मेल आला होता. त्यात असे लिहिले होते की ‘गेल्या वर्षी, ‘मी रु.२ लाखाची गुंतवणूक केली होती पैकी रु.८०,०००/- मी विम्यात गुंतवले होते.’ ह्या एकाच वाक्यामुळेच मला हा लेख लिहावा असे वाटत आहे. तसे पाहिल्यास या मेलमध्ये विशेष असे काहीच नाही. कारण मला नेहमीच गुंतवणुकीबाबत सल्ला विचारणारे मेल येतच असतात. परंतु येणा-या बहुतांशी मेलमधील मानसिकता ही अशीच असते, हे खरंच चिंताजनक आहे.
सर्वच माध्यमातून येणा-या जाहीराती व प्रभावी विक्रीतंत्रच या अशा मानसिकतेला कारणीभूत असते. तसेच सर्व विमा कंपन्यांचेएजंट लोकांच्या मनात असा ग्रह करुन देत असतात, की “तुम्ही अमुक एक रकमेचा मासिक/त्रैमासिक/वार्षिक विमा हप्ता भरुन तुमचे भविष्य सुरक्षित करा, तुम्हाला अमुक एक वर्षानंतर एवढी रक्कम मिळेल, परत जर काही अघटीत घडले तर वारसाला एवढी रक्कम मिळेल, शिवाय तुम्हाला कलम ८०-सी अंतर्गत आयकरात सुटही मिळेल”, असंच काहीतरी तुमचा एजंट वर्षानुवर्षे तुम्हाला सांगत असतो व यालाच बळी पडून तुमचा असा समज होतो की विमा काढणे ही फारच चांगली गुंतवणूक आहे.
पूर्वी विमा विकताना एजंट – एजंट मध्ये स्पर्धा असायची. कारण यातून मिळणारे कमिशनचे व विविध लाभ, जसे की अमुक एक टार्गेट पूर्ण केले की काही वस्तु, सोने, गाडी, परदेशदौरा इ. हेही एक कारण होते व आहे. पूर्वी विमा कंपन्यांच्या जाहीराती फारच कमी प्रमाणात केल्या जात असत मात्र सध्यातर अनेक विमा कंपन्या बाजारात असल्यामुळे त्यांच्यातही व्यावसाईक स्पर्धा एवढी वाढली आहे की, त्याना विविध प्रकारच्या माध्यमातून सतत जाहीराती कराव्याच लागतात. हा सततचा होणारा भडिमार हेही ‘विमा म्हणजे गुंतवणूक’ असे समजण्यामागे आहेच. एका सर्व्हेनुसार तीन वर्षापूर्वी जेवढ्या जाहीराती विमा कंपन्या करत होत्या त्यात आता जवळपास ८ पट वाढ झालेली आहे. तसे पाहिल्यास सध्याच्या जगात ह्यात गैर असे काहीच नाही. कारण हा काळच मुळी स्पर्धेचा आहे व स्पर्धा म्हटली की सारे काही माफ. पण ह्यामुळे पुरेसा विमा घेऊन आपल्या वारसांचे जीवन सुरक्षीत केलेले आहे असा लोकांचा गैरसमज होतो. प्रत्यक्षात मात्र खेदाने असे नमूद करावेसे वाटते, की विम्याचा हा जो असा प्रचार व प्रसार केला जात आहे,तोच मुळी चुकीचा आहे.
आणि म्हणूनच हाच मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, कारण विमा कंपन्यांमध्ये जमा केला जाणारा हप्त्याच्या रुपातील पैसा हा, विमा संरक्षणासाठी कमी व गुंतवणूक म्हणून जास्त प्रमाणात केला जातो. ह्याचे सर्वात महत्वाचे व प्रमुख कारण जर कोणते असेल तर गेल्या अनेक पिढ्यांपासून, विमा एजंट या जमातीने असा एक भ्रम सार्वत्रिकरित्या पसरवलेला आहे की ‘टर्म इन्शुरन्स’ विकत घेणे म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे, कारण यात भरलेले पैसे तुम्हाला कधीच हयातीत परत मिळत नाहीत. हे असं का घडतं? तर तुमच्या मागे नेहमीच कोणता ना कोणता विमा एजंट तुम्हाला गाठून तुम्हाला ‘विमा ही कशी चांगली गुंतवणूक आहे?’ हे तुमच्या कानीकपाळी ओरडत असतो. काही वेळा ही ब्याद आपल्याकडे नको म्हणून काही व्यक्तीच तुमचा रेफरन्स त्याला देत असतात. मात्र तुम्हाला विमा विकताना तो स्वत:हून कधीच ‘टर्म इन्शुरन्स’ बद्दल चकार शब्दसुध्दा बोलत नाही. उलट जर तुम्ही याबाबत त्याला काही विचारले, तर तो तुम्हाला लगेच असे निदर्शनाला आणून देतो की यातून तुम्हाला काहीच परत मिळणार नाही. आणि निश्चितच तुम्ही ज्यातून आपल्याला काहीच जर मिळणार नसेल तर कशाला ‘टर्म इन्शुरन्स’ विकत घ्यावयाचा असा विचार करुन तीच विमा पॉलीसी विकत घेता ज्यातून तुम्हाला काही वर्षानंतर पैसे परत मिळणार असतात. इथे तो एजंट मनात खुश होत गालातल्या गालात हसत असतो, “कसं मी बरोबर पटवल! आता मला पहिल्या वर्षी एवढे कमीशन मिळेल व नंतर अमुक-अमुक वर्षे मला नियमित एवढे-एवढे वार्षिक कमिशन मिळत राहील.” थोडक्यात त्याने तुम्हाला कसे गंडवले हे कधीच कळत नाही.
आता तुम्ही विचाराल की ‘या प्रकारच्या पारंपरिक विमा पॉलिसीतून काही फायदा असतो की नाही?’ तर निश्चितच असतो, पण यातील सर्वात जास्त फायदा हा त्या एजंटला असतो, ज्याने तुम्हाला हा विमा विकलेला असतो. याचे प्रमुख कारण असते ते म्हणजे विमा एजंटने केलेली तुमची मानसिक अवस्था, ज्यामुळे तुम्ही तो विकत घेता. विमा एजंट याला बहुतांशी ‘Life’ संबोधत असतात. येथेच तर सारी गल्लत आहे. ‘Life’ जेव्हा असा विचार करतो की, आपल्याला अमुक एवढे विमा संरक्षण मिळाले आहे, त्याचवेळी विमा एजंट व विमा कंपनी मात्र त्यांच्यासाठी विमा हप्ता हे पैसे मिळवण्याचे एक माध्यम समजत असतात. या वेळी ‘Life’ मात्र विचार करत असतो की जर माझा अचानक मृत्यु झाला, तर माझ्या पत्नीला/पतीला किंवा अन्य वारसाला रु.२० लाख मिळतील जे त्यांचेसाठी पुरेसे असतील. एकदा का ‘Life’ च्या आयुष्याची (Life) किंमत गळी उतरवली की तो एजंट त्याच्या मनातील ‘टर्म इन्शुरन्स’ चा कीडा अलगद बाजूला करण्यात यशस्वी होतो आणि त्याबदल्यात तो विकत असतो एक अतिशय खर्चिक विमा पॉलीसी.
मी जे काही इथे सांगत आहे ते तुम्ही सहजपणे पडताळून पाहू शकता. आता असे करा की तुम्ही तुमच्या माहितीतल्या एका विमा एजंटला फोन करुन सांगा की तुम्हाला रु.२० लाखाचे विमा संरक्षण घ्यावयाचे आहे तेव्हा मला एखादा चांगली विमा योजना सांग.तसेच दुर-या एका विमा एजंटला फोन करून सांगा की तुम्हाला रु.२० लाखाचा जीवन विमा विकत घ्यायचा आहे आणि त्यासाठी मीवार्षिक रु.३०००/- चाच हप्ता भरण्यास तयार आहे, तेव्हा मला एखादी चांगली विमा योजना सुचव. आता तुम्हाला जो पहिला एजंट भेटावयास येईल तो तुम्हाला ‘टर्म इन्शुरन्स’ बाबत चकार शब्दसुध्दा न सांगता एखादी पारंपरिक विमा योजना तुमच्या समोर सादर करेल. मात्र तुम्ही बोलावलेल्या दुस-या एजंटची जेव्हा खात्री होईल की, तुम्ही वार्षिक रु.३०००/- पेक्षा जास्त हप्ता भरावयास तयार नाही, तेव्हा तो नाईलाजाने का होईना ‘टर्म इन्शुरन्स’ च्या योजनेची माहिती अवश्य देईल. कारण त्याला धंदा घालवावयाचा नसतो.
विमा विक्रीचे सद्य रुप अधिक विमा खरेदी करणा-यांची पॉलीसीच्या लाभाची लालसा याचा एकत्रित परिणाम म्हणजे वर सांगितलेलेविम्याबाबतच अज्ञान, ज्यामुळे बचतीची चांगली सवय असणारे बरेचसे भारतीय, बाजारात अनेक गुंतवणुकीची साधने उपलब्ध असूनही त्यामध्ये गुंतवणूक न करता विम पॉलिसी हेच गुंतवणुकीचे माध्यम समजून त्यात पैसे टाकत असतात. कारण मुळातच त्याना इन्शुरन्स व गुंतवणूक यातील फरकच समजेला नसतो. तसेच विम्याचा सर्वोत्तम पर्याय कोणता? तो कोणी व कधी घ्यावा हे अजिबात माहीतच नसते व त्यामुळे वारंवार त्याच-त्याच चुका केल्या जात असतात. यामुळेच गोंधळाची परिस्थिती उद्भवत असते.
आता हेच पहा, गुंतवणुकीसाठी प्रत्येक माणसाच्या गरजेनुसार व जोखीम स्विकारण्याच्या तयारी/क्षमतेनुसार आर्थिक बाजारामध्येविविध गुंतवणूकीच्या योजना उपलब्ध असतात. मात्र अज्ञानामुळे या चांगल्या माध्यमाचा उपयोग गुंतवणुकीसाठी फारच थोड्या व्यक्ती करत असतात. आता कमिशनच्या बाबतीत बोलवयाचे झाल्यास इन्शुरन्स व अन्य गुंतवणूक पर्याय या दोन्ही प्रकारातील एजंटना कमिशन हे मिळतच असते. कारण गुंतवणूक करु इच्छीणा-याला कोणाला तरी त्याचा मोबदला द्यावा लागतो, एवढ्यावरच या दोन प्रकारच्या एजंट मधील तुलना संपते.
आता आपण प्रथम हे पाहुया की विमा म्हणजे काय? आणि तो कशा स्वरुपात घ्यावा? आणि इन्शुरन्स व गुंतवणुकीतील महत्वाचा फरक तो काय? एका वाक्यात सांगायचे झाले तर विमा म्हणजे भविष्यातील आर्थिक गरजेचे संरक्षण विकत घेणे. जर काही कारणाने एखाद्या मिळवत्या व्यक्तीचा अकाली मृत्यु झाला, तर त्याच्या पश्चात रहाणा-या व त्याच्यावर अवलंबून असणा-या व्यक्तींनाआर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी जीवन विमा संरक्षण गरजेचे असते. तसेच मालमत्तेचा, आजारपणाचा, कायदेशीर दायीत्वाचा आणि अनेक गोष्टींचा योग्य तो विमा उतरवणे हे जीवनविम्या इतकेच महत्वाचे असते. आपल्या जीवनाचा विमा उतरवताना सर्वोत्तम विमा योजना म्हणजे ‘टर्म इन्शुरन्स’ ज्यामध्ये तुम्ही फक्त विम्याचीच रक्कम, ज्या उद्देशासाठी विमा घ्यावयाचा आहे त्यासाठीच भरत असता. कारण विम्याचा खरा उपयोग हा आपल्या प्रिय व्यक्तीना आपल्या पश्चात आर्थिक सुरक्षेची गरज म्हणून असतो. मात्र ज्यावेळी तुम्ही ‘टर्म इन्शुरन्स’ व्यतिरिक्त अन्य विम्याची योजना विकत घेता, त्यावेळी तुम्ही गुंतवणूक समजून तो विकत घेत असता. जेव्हा गुंतवणूक समजून विमा विकत घेता तेव्हा, तुम्ही अन्य गुंतवणुकीपासून मिळणा-या लाभांना मुकत असता. कारण गुंतवणूकीच्या तत्त्वात न बसणारी अनेक कारणे इन्शुरन्समध्ये आहेत. यातील काही कारणे:
तरलतेचा अभाव: गुंतवणूक ही नेहमीच तरल (लिक्वीड) असलीच पाहीजे. कारण हा गुंतवला जाणारा पैसा तुमचा आहे, तो तुम्हाला काही सहजपणे मिळालेला नसतो तर त्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागलेले असतात. वर तुमच्या काही इच्छा आकांक्षा बाजुला सारुन तुम्ही तो बाजुला काढलेला असतो. म्हणूनच जर का अचानक गरज लागली तर तो केव्हाही उपयोगात आणता आलाचपाहीजे, अन्यथा वेळेला उपयोगी न येणा-या गुंतवणूकितील पैशाचा उपयोगच काय. आता इन्शुरन्स पॉलिसीच्या बाबत काय होते की,गुंतवणूक म्हणून जी रक्कम तुम्ही गुंतवलेली असते ती अतीदिर्घ मुदतीसाठी (विमा पॉलीसीच्या मुदतीनुसार) अडकून रहात असल्याने ती तुम्हाला मध्येच, हवी तेव्हा, काढता येत नाही. या व्यतिरिक्त कोणतीही विमा योजना, त्या प्रकारातील कोणत्याही गुंतवणूक साधनापेक्षा, खूपच कमी परतावा गुंतवणुकीवर मिळवून देत असते. आता अशी कोणती योजना आहे कि जी गुंतवणूकीबरोबरच करबचतीचासुद्धा लाभ देते? तर यासाठी चांगले पर्याय म्हणजे काही रक्कम पब्लिक प्रॉव्हिडंड फंडात गुंतवणे व काही रक्कम म्युच्युअल फंडाच्या करबचतीच्या योजनेत गुंतवणे हा होय. पब्लिक प्रॉव्हिडंड फंडात ५ वर्षांचा लॉक-इन पिरिअड असतो तर म्युच्युअल फंडाच्या करबचतीच्या योजनेत ३ वर्षांचा लॉक-इन पिरिअड असतो. या दोन्ही योजनेतील लॉक-इन पिरियड हा विमा पॉलिसीपेक्षा खूपच कमी असतो व दोन्ही गुंतवणूकीतून विमा योजनेप्रमाणेच कलम ८०-सी अंतर्गत आयकरात सूट मिळते.
पारदर्शकतेचा अभाव: आम्ही असे मानतो की सर्व प्रकारच्या गुंतवणूक पर्यायात पारदर्शकतेला अनन्यसाधारण महत्व असलेच पाहीजे.ज्या विमा योजनेला बरेच लोकं गुंतवणूक म्हणून पहात असतात त्यात या गोष्टीचा पूर्ण अभाव असतो. ज्या गुंतवणूक साधनात पारदर्शकता नसते त्याच साधनात सर्वसाधारणपणे घोटाळे, अकार्यक्षमता आणि असमाधानकारक कामगिरी होत असते. भारतातील म्युच्युअल फंड उद्योग ज्या प्रमाणात पारदर्शकता व चांगली कामगिरी करत असताना भारतातील विमा क्षेत्रात मात्र त्या तुलनेतकोणतेच मापदंड दुर्दैवाने पाळले जात नाहीत. यामुळेच तुम्ही विमा योजनेत गुंतवलेले पैसे कोठे गुंतवले जातात, ते कोणकोणत्या साधनात व किती प्रमाणात गुंतवले जातात या बाबतच फारच थोडी जाणकारी तुम्हाला विमा कंपनीकडून दिली जात असते. या बाबतीत म्युच्युअल फंडाच्या प्रत्येक योजनेत याची माहीती व्यवस्थित पणे दिलेली असते. म्युच्युअल फंडात रोजच्यारोज निव्वळ मालमत्ता मूल्य, गुंतवणुकीचा तपशील, जर नियमात काही बदल झाले तर ते लगेच तुम्हाला समजून घेण्याची सोय असते. जर फंड मॅनेजर किंवा एखाद्या महत्वाच्या जागेवरील व्यक्तीमध्ये बदल झाला तर तो सार्वजनिक केला जातो ज्यामुळे गुंतवणूकीच्या व्यवस्थापनात किंवा निर्णयात काय बदल घडू शकतो याचा तुम्ही अंदाज बांधू शकता. हे सारे नियम खरं म्हणजे विमा क्षेत्रालाही लागू करणे गरजेचे आहे. पण सध्या तरी याचा अभावच दिसुन येत आहे.
किंमत (कॉस्ट): जे एजंट म्युच्युअल फंडाच्या योजना, रिझर्व्ह बँकेचे सरकारी रोखे, कंपन्यांचे बॉंड, पोस्टल डिपॉझीटस, पीपीएफ या प्रकारातील आर्थिक उत्पादने विकतात त्याना मिळणारे कमिशन व इन्शुरन्स एजंट यांना मिळणारे कमिशन यात जमिन अस्मानाचा फरक आहे. खर म्हणजे विमा एजंटला दिले जाणारे जास्त कमिशन ही गुंतवणूकदाराची केली जाणारी लूटच आहे. आता तुम्ही जेव्हा एखादी पारंपरिक विमा योजना विकत घेता, तेव्हा विमा एजंटला पहिल्या वर्षी सरासरी ४०% पर्यंत कमिशन दिले जाते, दुस-या वर्षी ते ७.५% ते १०% या दरम्यान दिले जाते व नंतरच्या उर्वरीत वर्षात ते ५% दराने दिले जाते. म्हणजेचे जर करबचत व गुंतवणूक या उद्देशाने तुम्ही पुढील २५ वर्षानंतर मॅच्युअर होणा-या विमा योजनेत दर वर्षी रु.१.५० लाख गुंतवले तर एजंटला मिळणारे एकूण कमिशन होते रु.२,४७,०००/- (पहील्या वर्षाचे रु.६०,०००/- + दुस-या वर्षाचे रु.१५,०००/- + पुढील २३ वर्षाचे प्रत्येक वर्षी रु.७,५००/- प्रमाणे रु.१,७२,५००/-). आता जे आर्थिक उत्पादन तुम्ही गुंतवणुकीचे साधन म्हणून विकत घेत असता, त्याच्या सेवेसाठी दिली जाणारी कमिशनची रक्कम ही फारच मोठी होते, ज्यामुळे मूळ गुंतवणुकदाराला मिळणारा परतावा हा खूपच कमी होत असतो. खरं म्हणजे हा कमिशनचा जास्त दर हाच मुळी विमा योजना ही गुंतवणुकीचे अत्यंत सामान्य साधन आहे हे सांगण्यास पुरेसे आहे.म्हणूनच सोकॉल्ड सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून विमा योजनेत गुंतवली जाणारी रक्कम हे अत्यंत वाईट डिल गुंतवणूकदारासाठी असते.
विमा हा जवळपास प्रत्येकाचीच ठराविक काळापर्यंत गरज आहे यात दुमत असण्याचे कोणतेच कारण नाही. परंतु प्रथम तुम्हाला किती रकमेचे विमा संरक्षण हवे आहे हे निर्धारीत करा व त्यानंतर तेवढे विमा संरक्षण ‘टर्म इन्शुरन्स’ च्या माध्यमातून घ्या व त्याच वेळी तुमच्या जोखीम स्विकारण्याच्या क्षमतेनुसार बाजारात उपलब्ध असणारी सर्व गुंतवणूक साधने तपासा, त्यांची मागील कामगिरी तपासा व नंतरच तुमच्या गुंतवणूकीचा निर्णय घ्या हाच खरा शहाणपणा होय.
परत एकदा सांगतो की विमा व गुंतवणूक यांची गल्लत करु नका, यातच तुमचे उज्चल आर्थिक भविष्य दडलेले आहे.
- Published in Investment
संपत्ती निर्माण करण्यासाठी कर बचत योजना (ELSS)
संपत्ती निर्माण करण्यासाठी कर बचत योजना (ELSS)
म्युच्युअल फंडाच्या कर बचत योजनेत शेअर बाजारातील गुंतवणूक असल्यामुलेश या प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करून संपत्ती निर्माण करणे शक्य होते.
एक प्रश्न वारंवार विचारला जातो कि अशी कोणती बचत योजना आहे कि ज्यातून निश्चितपणे जास्त उत्पन्न मिळवता येईल. उत्तर सोपे आहे कि तुम्ही नियमित मासिक/त्रैमासिक/वार्षिक तत्वावर गुंतवणूक करत राहून चक्रवाढीचा फायदा मिळवून तुमचे उदिष्ट साध्य करू शकता. तुमची जशी जोखीम स्वीकारण्याची तयारी असेल त्याप्रमाणे योग्य त्या साधनात गुंतवणूक करून तुम्ही हे साध्य करू शकता, मग तुम्ही जोखीम स्वीकारणारे आहात कि जोखीम तुम्हाला स्वीकारावयाची नाही यावर तुम्हाला मिळणारा परतावा अवलंबून असेल. ज्यांना अजिबात जोखीम स्वीकारावयाची नसेल त्यांना जे जोखीम स्वीकारण्यास तयार असतील त्यांच्या पेक्षा जास्त काळ गुंतवणूक करावी लागेल, व ज्यांची कॅल्क्युलेतेड जोखीम स्वीकारण्याची तयारी असेल ते कमी वेळात त्यांचे उदिष्ट साध्य करू शकतील एवढाच फरक आहे.
आता हीच गोष्ट स्पष्ट करून सांगण्यासाठी आम्ही पब्लिक पॉव्हीडंड फंड (PPF), बीएसई चा टोटल रिटर्न इंडेक्स व म्युच्युअल फंडाच्या कर बचतीच्या योजना या तीन गुंतवणूक योजना विचारात घेतल्या आहेत. आयकर कलम ८०-सी अंतर्गत गुंतवणुकीसाठी वार्षिक रु.१.५० लाख एवढी मर्यादा आहे म्हणून आम्ही असे गृहीत धरले आहे कि जर गेले २० वर्षे नियमितपणे दर वर्षी रु.१.५० लाख एवढी गुंतवणूक या तीन प्रकारात केली असती तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य काय असते म्हणजेच गेल्या २ दशकांचा विचार आम्ही येथे केला आहे. याचे कारण म्हणजे गेल्या दोन दशकात शेअर बाजार विविध प्रकारचा स्थित्यंतरातून गेलेला आहे ज्यामध्ये आहेत बाजारात झालेले प्रमुख चढ उतार, घोटाळे, जागतिक घटनांचे परिणाम व भारतातील घटनांचे परिणाम या सर्वाचा आर्थिक घडामोडीवर झालेला परिणाम विचारात घेतला आहे.
पहिला पर्याय अर्थात सुरक्षित गुंतवणूक पी पी एफ यात दिसते कि गेले २० वर्षे दर वर्षी जर रु.१.५० प्रमाणे एकूण रु.३० लाखाची गुंतवणूक या योजनते केली असती तर २० वर्षांनी, व्याज दरातील फरक होऊनही या गुंतवणुकीचे मूल्य असते रु.८२.१४ लाख म्हणजेच वार्षिक परतावा झाला ९.५९%
आता दुसरा पर्याय जर आपण सेन्सेक फंडात गेले २० वर्षे दर वर्षी जर रु.१.५० प्रमाणे एकूण रु.३० लाखाची गुंतवणूक या योजनते केली असती तर २० वर्षांनी, या गुंतवणुकीचे मूल्य असते रु.१ कोटी ४२ लाख म्हणजेच वार्षिक परतावा झाला १४.३८% या कालखंडात सेन्सेक्स २५३९ ते २७००० पर्यंत वाढला पण २००८ मध्ये तो २१००० पर्यंत वाढून नंतर तो ८००० पर्यंत आपटला होता परत तेथून उसळी घेऊन तो आता जवळपास २९००० झाला आहे.
आता तीसरा पर्याय जर आपण म्युच्युअल फंडाच्या कर बचतीच्या योजनेत गेले २० वर्षे दर वर्षी जर रु.१.५० प्रमाणे एकूण रु.३० लाखाची गुंतवणूक या योजनते केली असती तर २० वर्षांनी, या गुंतवणुकीचे मूल्य असते रु.२ कोटी ७२ लाख म्हणजेच वार्षिक परतावा झाला १९.८१% या कालखंडात सेन्सेक्स २५३९ ते २७००० पर्यंत वाढला पण २००८ मध्ये तो २१००० पर्यंत वाढून नंतर तो ८००० पर्यंत आपटला होता परत तेथून उसळी घेऊन तो आता जवळपास २९००० झाला आहे. जर तुम्ही वार्षिक १.५० गुंतवणूक दर महा रु.१२,५००/- प्रमाणेही करू शकता.
आता वरील तिन्ही उदाहरणे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेच असेल कि म्युच्युअल फंडात नियमित दर महा गुंतवणूक करणे हे केव्हाही चांगलेच आहे दर महा नियमित गुंतवणूक केल्यामुळे सरासरी होते ज्यामुळे बाजार्तील चढ उतार हे आपल्या फायद्याचेच होतात.
- Published in Tax Savings
मध्यमवर्गीय व्यक्तीने गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी?
मध्यमवर्गीय व्यक्तीने गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी?
नुकतीच मला Whatsapp गृपवर मध्यमवर्गातील व्यक्तीने कोणत्या साधनात व किती प्रमाणात गुंतणूक करावी असा प्रश्न विचारला गेला होता म्हणूनच हा ताजा लेख मी आजच लिहिला आहे तो आपणास कदाचित मार्गदर्शक होऊ शकेल.
सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय व्यक्ती हि निश्चित उत्पन्न देणाऱ्या सुरक्षित साधनात गुंतवणूक करण्यासाठी प्राधान्य देत असतो. परंतु आजकाल बँक ठेवींवरील व्याजाचे दर हे ७% पर्यंत कमी झालेले असून जर भविष्यात महागाईचा दर नियंत्रणात राहिला तर RBI व्याजदर आणखी कमी करू शकेल. आपणास माहित असेलच कि मुख्यत्वेकरून आपल्या सारख्या Developing Country मध्ये दरवर्षीच महागाई वाढतच असते यामुळे रुपयाची किंमतही दरवर्षी कमी होत असते. बँकेकडून मिळणाऱ्या व्याजातून जर महागाईचा दर कमी केला तर खरे म्हणजे फक्त पैसे सुरक्षित ठेवण्याचे उद्दिष्टच फक्त यातून पुरे होऊ शकते. यामुळे बँकेत नियमित बचत किंवा ठेवी करून दीर्घ काळात संपत्ती निर्माण करता येत नाही हि वासुस्थिती आहे. यामुळे प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीने गुंतवणुकीचे अन्य पर्याय शोधलेच पाहिजेत.
नियमित किंवा एकरकमी गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण करण्याची ताकद हि शेअर बाजारात सर्वाधिक जास्त आहे हे सिद्ध झालेले त्रिकालाबाधित सत्य आहे, याचा अर्थ आपली सर्वच गुंतवणूक हि शेअरबाजारात किंवा म्युचुअल फंडात करावी असा होत नाही. आपली गुंतवणूक हि विविध साधनात विभागलेली असली पाहिजे कारण शेअरबाजारात कायम तेजी राहणार नाही आणि जर मंदीच्या काळात पैशाची गरज लागली तर नुकसानीत पैसे काढावे लागतील, म्हणून आपली गुंतवणूक विभागून ठेवावी. मात्र आपल्या गुंतवणुकीचा काही हिस्सा हा शेअरबाजारात गुंतवलेला असलाच पाहिजे.
कोणत्या साधनात किती प्रमाणात गुंतवणूक करावी यासाठी शास्त्र आहे परंतु हे व्यक्तीसापेक्ष बदलत राहते कारण प्रत्येक व्यक्तीची गुंतवणुकीची गरज वेगवेगळी असते, जोखीम स्वीकारण्याची क्षमता व तयारी वेगवेगळी असते. गुंतवणूक कोणत्या साधनात करावी याचा निर्णय करताना अनेक गोष्टी विचारात घ्याया लागतात, वय, मिळकत, मिळकत स्थिर आहे कि अस्थिर आहे, नोकरी का व्यवसाय, घरात किती व्यक्ती आहेत, त्यातील किती व्यक्ती मिळवत्या आहेत असल्यास त्यांचे उत्पन्न किती, किती व्यक्ती तुमच्यावर अवलंबून आहेत, किती काळासाठी गुंतवणूक करण्याची तयारी आहे, गुंतवणूक कोणत्या उद्देशाने करावयाची आहे, गुंतवणूक नियमितपणे करावयची आहे कि एकरकमी करावयाची आहे इ. अनेक गोष्टींचा विचार करूनच तुमचा चांगला व अनुभवी गुंतवणूक सल्लागार तुम्हाला गुंतवणुकीचा सल्ला देत असतो. यामुळे सर्वांना एकाचप्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला मी देऊ शकत नाही मात्र, काही मार्गदर्शक तत्वे आहेत ती मी येथे देण्याचा प्रयत्न करत आहे.
गुंतवणुकीचे प्रमाण हे वयोमानानुसार बदलते असावे, यासाठी विविध प्रकारची गणितीय सूत्र अवलंबली जाते. मात्र समजण्यासाठी सोपे म्हणून १०० या संखेतून तुमचे वय वजा करता जी बाकी येईल तेवढ्या प्रमाणातील रक्कम हि दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करण्यासाठी शेअरबाजार व म्युचुअल फंडात गुंतवावी व हे प्रमाण दरवर्षी वयानुसार बदलते ठेवणे शक्य होत नाही म्हणून किमान दर ५ वर्षांनी तरी ते बदलत न्यावे.
- नियमितपणे किती गुंतवणूक करावी: सर्वसाधारणपणे भारतीय लोक त्यांच्या मासिकप्राप्तीच्या सरासरी ३५% रकमेची गुंतणूक करतो. हे प्रमाण योग्य आहे, मात्र व्यक्तीसापेक्ष ते बदलू शकते. २५ ते ३० वर्षाचे व्यक्तीने जेव्हा जबाबदारी नसते तेव्हा जास्त गुंतवणूक करावी व एकदा खर्च सुरु झाले कि ती कमी करून किमान ३५ ते ४०% एवढीतरी करावी.
- लिक्विड फंड: आकस्मिक खर्चाच्या तरतुदीसाठी या फंडात किमान आपल्या ६ महिन्याच्या उत्पन्नाएवढी रक्कम कायम ठेवावी. यात सरासरी आपल्या गुंतवणुकीच्या १०% रक्कम गुंतवत जावी.
- शेअर मार्केट: शेअरबाजारात जर तुम्ही ट्रेडिंग करणार असाल तर मध्यमवर्गीय नोकरदार माणसाने ते शक्यतो टाळावे कारण अभ्यास नसतो व वेळ नसतो. मात्र जर तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूकदार म्हणून गुंतवणूक करू इच्छित असाल तर अवश्य करावी. यासाठी अशी एखादी चांगली कंपनी निवडावी कि जिचे कॅपिटल कमी आहे मात्र त्या कंपनीच्या उत्पादनाची सर्वत्र व जास्त प्रमाणात विक्री होते थोडक्यात ज्या कंपनीची उत्पादने सर्वात जास्त लोकं वापरतात. अशी कंपनी निवडल्यावर दर महिना किंवा दर तीन महिन्यांनी एका ठराविक तारखेला किमान एक तरी शेअर विकत घ्यावा. मात्र शेअर बाजार किंवा कमोडीटी बाजारात डे-ट्रेडिंग, फ्युचर्स/ऑप्शन्स या प्रकारापासून दूर रहानाण्याचा शकतो प्रयत्न करा. शेअरबाजारात आपल्या एकूण गुंतवणुकीपैकी साधारण १५% रक्कम गुंतवावी.
- म्युचुअल फंड: म्युचुअल फंडात आपल्या गुंतवणुकीचे व्यवस्थान हे एक तज्ञ फंड व्यवस्थापक करत असतो ज्याला शेअरबाजाराचे चांगले ज्ञान ज्ञान असते तसेच सर्व साधनसामुग्रीही त्याचेजवळ उपलब्ध असते. म्हणून सर्वसामान्य माणसाने म्युचुअल फंडाच्या विविध योजनेत अवश्य गुंतवणूक करावी. हि गुंतवणूक एसआयपी च्या माध्यमातून दीर्घकाळासाठी अगदी आपण निवृत्त होईपर्यंत करावी, मध्ये जर आवश्यकता भासली तर पैसे काढावेत. म्युचुअल फंडामध्ये विविध प्रकारच्या योजना असतात तुमच्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीने गुंतवणुकीसाठी योग्य योजनेची निवड करावी. याचे प्रमाण एकूण गुंतवणुकीच्या ५०% एवढे तरी असावे.
- रिअल इस्टेट: स्वत:ला राहण्यासाठी जर घर हवे असेल ते घेतलेच पाहिजे मात्र गुंतणूक म्हणून दुसरे घर घेणे किंवा कोठेतरी जागा घेऊन ठेवणे त्यासाठी बँकेचे कर्ज काढणे या गोष्टी टाळलेल्याच चांगल्या कारण एकतर स्थावर मालमत्ता विकत घेताना त्याला चांगला दर द्यावा लागतो पण विकताना तो मिळेलच याची खात्री नसते, या व्यवहारात पारदर्शकता कमी असते. अल्प काळात यातून कधीतरी जास्त परतावा मिळू शकतो मात्र दीर्घ काळात मिळणारा परतावा हा शेअरबाजारापेक्षा कितीतरी प्रमाणात कमी असतो. स्वत:साठी गृहकर्ज घेऊन घर घेत असाल तर जेव्हढा इएमआय असेल त्याच्या १०% रकमेएव्हढ्या रकमेची एसआयपी म्युचुअल फंडात अवश्य करावी जेव्हा तुमचे गृहकर्ज फेडून होईल तेव्ह्या तुम्ही बँकेत भरलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम तुम्हाला मिळू शकेल. यामुळे स्थावर मालमत्तेत किती प्रमाणात गुंतवणूक करावी याचे प्रमाण देता येत नाही. इएमआय कधीही आपल्या मासिक उत्पनाच्या ३०% ते ४०% पेक्षा जास्त नसावा.
- बॉंड/पोस्ट/बँक ठेवी या प्रकारात १५% ते २०% रक्कम गुंतवावी जी केव्हाही उपयोगी येऊ शकेल.
- सोने: उर्वरित ५% रक्कम सोन्यात गुंतवावी. खरे पाहता सोन्यातील गुंतवणूक हि भावनिक असते मात्र यातून जास्त लाभ मिळत नसतो.
- जीवन विमा: मृत्यू कुणाला केव्हा येईल हे माहित नसते म्हणून प्रत्येकानेच आपल्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचे सुरक्षिततेसाठी टर्म इन्शुरन्सच्या माध्यमातून प्रथम विमा घ्यावा. बाकी विम्याचे कोणतेही प्लान घेऊ नयते. २५/३० वर्षाचे व्यक्तीला वार्षिक रु.६ ते ७००० रुपयांच्या वार्षिक हप्त्यात सुमारे रु.१ कोटीची विमा कवच मिळू शकते.
- मेडिक्लेम: प्रत्येकाने आपल्या कुतुबातील सर्व व्यक्तींचा समावेश असणारी मेडिक्लेम पोलिसी अवश्य घ्यावी कारण आपल्या घरातील कोणालाही कधीही आजार येऊ शकतो हे लक्षात ठेवा त्याची तरतूद केली तर आर्थिक भर जाणवणार नाही.
याचप्रमाणे आपले सारे असेटस विमा कवच घेऊन सुरक्षित करणे शहाणपणाचे असते. तसेच आपल्या गुंतवणुकीला वारस हा नेमलाच पाहिजे ज्यामुळे भविष्यात काही अघटीत घडले तर वारसाला त्रास होत नाही. याचप्रमाणे एकदा का आपले असेटस निर्माण झाले कि प्रत्येकाने इच्छापत्र तयार करून ठेवावे.
जर पती-पत्नी दोघेही नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यांचे दोघांचे उत्पन्नाचा ताळमेळ घालून दोघांचीही वेगवेगळी गुंतवणूक करावी.
- Published in Investment
टॅक्स सेव्हिंग योजनेचे फायदेच फायदे
टॅक्स सेव्हिंग योजनेचे फायदेच फायदे
जर तुम्हाला आयकर कलम ८०-सी अंतर्गत, रु.१.५० लाखापर्यंत गुंतवणूक करुन करबचत करावयाची असेल, तर म्युच्युअल फंडाच्या करबचतीच्या योजनेत गुंतवणूक करावी. हे करणे अन्य सर्व आयकर कलम ८०-सी खालील गुंतवणूक पर्यायांपेक्षा खूपच फायदेशीर असते, ते कसे ते आता समजून घेऊया.
भारतीय करकायद्या अंतर्गत करबचतीसाठी अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. असे असुनही फारच थोडया व्यक्ती उपलब्ध असणा-या सर्व पर्यायांचा तुलनात्मक अभ्यास करुन त्यांच्या करबचतीसाठी करावयाच्या गुंतवणुकीचा निर्णय घेत असतात. ब-याचश्या व्यक्ती करबचतीसाठी कोणताही विचार न करता कोणत्यातरी दीर्घ मुदतीच्या साधनात पैसे गुंतवण्याऐवजी खरे म्हणजे अडकवत असतात.महागाईचा विचार केल्यास अशा साधनातून काहीच फायदा हाती लागत नाही. जेव्हा हे पैसे त्याच्या हातात परत मिळतात, तेव्हा त्यापैशांची खरेदीची क्षमता नगण्य झालेली असते.
उदा. जेव्हा तुम्ही करबचतीसाठी एखादी विमा योजना विकत घेता, तेव्हा त्यातील सर्वाधिक फायदा हा विमा एजंट कमिशनच्या स्वरुपात खाऊन टाकत असतो. तुम्हाला काय मिळते? तर अत्यल्प विमा संरक्षण. जर तुमचे काही बरे वाईट झाले, तर मिळणारी तुटपुंजी रक्कमतुमच्या वारसाची गरज भागवू शकणार नाही. तसेच मुदतपूर्तीनंतर मिळणारी तुटपुंजी रक्कम तुमची भविष्यातील आर्थिक गरजहि भागवू शकणार नाही. पारंपरिक विमा साधनातून मिळणारा परतावा हा, वार्षीक चक्रवाढीने ५% पेक्षा जास्त कधीच मिळत नाही. युलीपमध्ये पैसे गुंतवणे म्हणजे अधिक नुकसान करून घेण्यासारखे आहे.
जर तुम्ही बँकेच्या पांच वर्षाच्या ठेवीत गुंतवणूक करत असाल तर, एक तर तुमचे पैसे ५ वर्षे अडकून रहातात, व दुसरे म्हणजे जे काही व्याज ६% च्या दरम्याने मिळते तेही करपात्र असते. आणि उरलेल्या लाभातून महागाईचा दर वजा केल्यास खरे म्हणजे तुम्ही तुमचे पैसे सुरक्क्षित ठेवण्यासाठी, मिळणा-या अतिरिक्त फायद्यावर पाणी सोडत असता. अत्यंत थोड्या व्यक्ती कर बचतीसाठी म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी लिंक सेव्हिंग स्किमचा, गुंतवणुकीसाठी विचार करतात.
हे असे का घडते? सर्वसाधारणपणे याचे एक प्रमुख कारण म्हणजे करबचत व गुंतवणूक याबाबत असणारा गोंधळ किंवा अज्ञान किंवा दुर्लक्ष करणे हेच आहे. सर्वसामान्य गुंतवणुकदार याबाबतचा निर्णय उशीरा म्हणजे अगदी मार्च महिना संपत आला की घेतो ते सुध्दा, जर त्याच्या कर सल्लागाराने सांगितले तर. किंवा एखादा एजंट त्याच्या हे गळी उतरवतो की “बाबारे, आता वर्ष अखेर आलेली आहे तेव्हा मी सांगतो त्याच साधनात (बहुतांशी विमा योजना) तू आता गुंतव”. तेव्हा तो याबाबतचा निर्णय घेतो. म्हणजेच आपण कोणत्यातरी कर बचतीच्या साधनात गुंतवणूक करुन मोकळे होतो व जेव्हा केव्हा पैसे परत मिळण्याची वेळ येते तेव्हा लक्षात येते की आपण फक्त कर बचतच केली बाकी हाती उरले एक मोठे शून्य.
हा परिणाम असतो कर व गुंतवणूक यातील वैचारिक गोंधळाचा. त्यामुळे होत काय, की विचारपूर्वक निर्णय न घेतल्यामुळे तो हमखास चुकीचा घेतला जातो. जेव्हा आपण कर बचतीसाठी किंवा अन्य कोणत्याही उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करतो तेव्हा त्या साधनाची आपण परिपुर्ण माहीती करुन घेतली पाहिजे.
यासाठी आपण गुंतवणूक कशासाठी करणार आहोत? त्याचे प्रमुख कारण काय? यातून मिळणारा फायदा किती? मिळणारा फायदा करपात्र आहे की करमुक्त आहे? पैसे किती काळ अडकून रहाणार आहेत? गुंतवणुकीसाठी किती पर्याय उपलब्ध आहेत? व यातील मला कोणता पर्याय योग्य आहे? जर एजंट मार्फत गुंतवणूक करणार असाल तर त्याला किती कमिशन मिळते? ते कमिशन वाजवी आहे का? जाणारे कमिशन तुमच्या गुंतवणुकीची रक्कम कमी करते काय? ही सर्व माहिती विचारपूर्वक मिळवून, लागल्यास त्यासाठी यातील खरोखर जाणकार असणा-या व्यक्तीची मदत घेऊन जर तुम्ही गुंतवणुकीचा निर्णय घेतलात तर तुमच्यावर पश्चातापाची वेळच येणार नाही.
त्याचप्रमाणे करबचतीचा व गुंतवणुकीच्या निर्णयाची चाल ढकल करु नका. वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला खरं म्हणजे माहीत असते की या वर्षी माझे एकूण उत्पन्न किती होणार आहे व यावर किती कर देय होणार आहे? जर आवश्यक असेल तर कर बचतीसाठी किती गुंतवणूक केली पाहीजे याचे नियोजन वर्षारंभीच करुन, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा निर्णय करु शकता.
म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी लिंक सेव्हिंग स्किम हा अतिशय उत्तम पर्याय करबचतीसाठी आहेच पण गुंतवणूक करण्यासाठी सुध्दा आहे.जर तुम्ही या योजनांचा पुर्वेतिहास पाहीला तर या योजनेत एसआयपीव्दारे गुंतवणूक करणे हे नेहमीच फायदेशीर ठरलेले आहे. यातील प्रमुख फायदे म्हणजे लॉक-इन पिरिअड फक्त ३ वर्षे असतो. पहिली तीन वर्षे सलग गुंतवणूक करुन, त्यातूनच नंतर पैसे काढून पुनर्गुंतवणुकीचाही फायदा घेता येतो. गुंतवणूक करताना कोणतेही चार्जेस वजा होत नाहीत. त्यामुळे संपूर्ण रक्कम गुंतवली जाते. शेअर बाजारातील चढ उतार हे जोखीम न समजता संधीच समजली पाहीजे. चढ उतार आहेत म्हणूनच जास्त उत्पन्न मिळते. गेल्या २० वर्षातअशा योजनांनी वार्षिक सरासरी २०% चक्रवाढ पध्दतीने परतावा दिलेला आहे. हा परतावा पूर्णपणे करमुक्त असतो. निवृत्तीपर्यंत नियमितपणे या योजनेत (ग्रोथ ऑप्शनमध्ये) गुंतवणूक करत राहून, नंतर डिव्हिडंड पेआऊटचा पर्याय स्विकारुन, कायम स्वरुपी वार्षिक/मासिक कर मुक्त आकर्षक परतावाही मिळवू शकता. या योजनेतून मिळणारा डिव्हिंडंड वार्षिक सरासरी १२% किंवा अधिक मिळत असतो.यातील काही योजनांमध्ये ज्यानी २० वर्षापूर्वी गुंतवणूक केली आहे, त्याना गेले ७ ते ८ वर्षे दरवर्षी वार्षीक सरासरी ७०% या दराने लाभांश मिळत असून मुद्दलातही जवळपास ७ ते ८ पट वाढ झालेली आहे. गरज आहे ती चांगल्या योजनेची काळजीपूर्वक निवड करुन, त्या योजनेत नियमितपणे दरमहिना एसआयपी माध्यमातून दीर्घ काळासाठी विश्वासपूर्वक गुंतवणूक करत रहाण्याची.
तुम्ही निवडत असलेले गुंतवणुकीचे साधन हे प्रथम योग्य गुंतवणूक साधनच असले पाहिजे. म्हणजेच करबचतीच्या लाभाचा पर्याय नसला तरी गुंतवणूक करावी असे ते प्रभावी साधन असले पाहीजे. नंतर त्यात जर कर बचतीच्या लाभाचाही समावेश असेल तर तो दुग्ध-शर्करा योग समजला पाहीजे. आणि हे सर्वच म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी लिंक सेव्हिंग स्किम ला लागू पडत असते.
म्हणूनच प्रत्येक करदात्याने आयकर कलम ८०-सी अंतर्गत करबचतीसाठी म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी लिंक सेव्हिंग स्किम योजनांचा वापर केला पाहीजे. सोबतच टर्म इन्शुरन्सव्दारे जास्तीत जास्त जेवढे विमा संरक्षण मिळू शकत असेल तेवढे अवश्य घ्यावे. २८ वर्षाच्या व्यक्तीला मासिक साधारण रु.५०० ते ६०० म्हणजे दिवसाला २० रु. पेक्षाही कमी (२० रुपयात आजकाल एक कप चहाही मिळत नाही) भरुन एक कोटी रुपयाचे विमा संरक्षण मिळते. यासोबत थोडा जास्त हप्ता भरुन तुम्हाला जास्तिचे अपघात विमा संरक्षण, कायम स्वरुपी अंपगत्व संरक्षण इ. घेता येते. तसेच हा टर्म इन्शुरन्स नवरा व बायको या दोघांच्या नांवे संयुक्त घेता येतो, ज्यात एकाचा मृत्यु झाल्यास त्याच्या विम्याची रक्कम मिळून उरलेल्या जोडिदाराचे विमा संरक्षणही पुढे चालू राहू शकते. परत टर्म इन्शुरन्सचा हप्ताही कलम ८०-सी अंतर्गत वजावटीस पात्र असतो.
- Published in Tax Savings