• 9503718779 Sujay
  • 9518 752 605 Sadanand
  • clients.tfs@gmail.com
  • साइन इन
  • साइन अप करा
  • Switch English

Thakur Financial Services

  • पहिले पान
  • आमच्या बाबत
  • म्युचुअल फंड
    • ऑनलान गुंतवणूक करा
    • म्युचुअल फंडाबाबत
    • म्युचुअल फंडाचे प्रकार
      • समभाग आधारित
      • कर्जरोखे आधारित
      • करबचतीच्या योजना
    • गुंतवणूक
    • शेअरबाजार
      • भांडवली बाजार
      • फ्युचर्स
      • ऑप्शन
    • डिमॅट खाते
    • उत्पादने
    • सेवा व सुविधा
  • विमा
  • आयकर
  • लेख
  • डाउनलोड
  • म्युच्युअल फंड ऑनलाईन
    • ऑनलान व्यवहार करा
  • संपर्क करा

माझ्या गुंतवणुकीचे मूल्य कमी झाले आहे म्हणून मी एसआयपी बंद करू का?

Tuesday, 12 February 2019 by Sadanand Thakur

माझ्या गुंतवणुकीचे मूल्य कमी झाले आहे म्हणून मी एसआयपी बंद करू का?

गेले काही दिवस मला ठाकूर फायनान्शियल सर्व्हिसेसच्या गुंतवणूकदारांचे अनेकवेळा फोन येत असतात त्यांचे म्हणणे असते कि त्यांना त्यांची चालू असणारी एसआयपी बंद करावयाची असते. एसआयपी बंद करण्याचे कारण काय आहे असे विचारले कि बहुमतांशी गुंतवणूकदारांचे म्हणणे असते कि आमच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी होत आहे मी जेवढे पैसे गुंतवले आहेत त्यापेक्षासुद्धा गुंतवणुकीचे मूल्य कमी झालेले आहे. मी जर हेच पैसे बँकेच्या आर.डी. मध्ये गुंतवले असते तर असे झाले नसते. त्यांचे हे म्हणणे १००% बरोवर आहे, बँक किंवा पोस्टाच्या आर.डी. मध्ये पैसे कधीच कमी होत नसतात. पण म्हणून चालू असलेली एसआयपी बंद करणे हा निर्णय योग्य होईल काय? आता आपण एका चांगल्या योजनांची कामगिरी पाहूया:

Franklin India Bluechip Fund – हि योजना लार्ज कॅप प्रकारातील आहे. हि योजना १ डिसेंबर १९९३ रोजी सुरु झाली, या योजनेत ज्यांनी सुरुवातीपासून दर महिना रु.१००० ची एसआयपी सुरु केली होती व ती जर आजपर्यंत चालू ठेवली असती तर एकूण गुंतवणूक झाली असती रु.३,०३,०००/- आणि त्या गुंतवणुकीचे ११/०२/२०१९ चे मूल्य आहे रु.५८,५६,५५०/- वार्षिक सरासरी चक्रवाढ दराने मिळालेला परतावा २०.२५%

आता या योजनेची आपण वाटचाल पाहूया.

१/१२/१९९४ गुंतवणूक १२००० मूल्य १८२६८ फायदा आहे

१/१२/१९९५ गुंतवणूक २४००० मूल्य २३४१३ नुकसान झाले आहे.

१/१२/१९९६ गुंतवणूक ३६००० मूल्य २८३१३ नुकसान झाले आहे

१/१२/१९९७ गुंतवणूक ४८००० मूल्य ५२००४ फायदा आहे

१/१२/१९९९८ गुंतवणूक ६०००० मूल्य ८०४३३ फायदा आहे

यानंतर कधीही नुकसान नाही

१/१२/२००३ गुंतवणूक १२०००० मूल्य ५२२६७५ फायदा आहे

१/१२/२००८ गुंतवणूक १८०००० मूल्य १२१५४४० फायदा आहे

१/१२/२०१३ गुंतवणूक २४०००० मूल्य ३१४०२३० फायदा आहे

१/१२/२०१८ गुंतवणूक ३००००० मूल्य ५९२२१४० फायदा आहे

अशी प्रत्येक प्रकारातील (लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टी कॅप, संतुलित इ. प्रकारातील) अनेक योजनांची मी उदाहरणे देऊ शकतो. सगळीकडे तुम्हाला कमी जास्त प्रमाणात हेच दिसून येईल.

एक लक्षात ठेवले पाहिजे कि दीर्घ मुदतीत म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही चांगल्या योजनेतून फायदा हा होतच असतो मात्र मधल्या मंदीच्या काळात नुकसानही होत असते. तेजी मंदीची आवर्तने बाजारात नेहमीच चालू असतात कधी कधी मंदीचा कालावधी जेव्हा वाढतो तेव्हा आपल्याला जास्त काळ नुकसान होत असते. बाजारात साधारणपणे ८ किंवा ९ वर्षांची सायकल असते यातील कोणतीतरी ३ वर्षे हि भरपूर फायदा मिळवून देणारी असतात. जर ती आपल्या वाट्याला सुरुवातीला आली तर पुढे नुकसान होण्याचे प्रमाण कमी होते मात्र जर तीच पहिली ३ वर्षे मंदीची आली तर फायद्यात येण्यासाठी जास्त काळ वाट पहावी लागू शकते. मात्र जेव्हा बाजारात मंदीनंतर परत तेजी येते तेव्हा फायदासुद्धा जास्त होतो कारण आपण मंदीच्या काळात गुंतवणूक नियमित करत राहिल्यामुळे आपल्याला जास्त युनिट्स प्राप्त होत असतात आणि मग तेजीच्या काळात जेव्हा एनएव्ही वाढते त्यामुळे आपला जास्त फायदा होतो.

बँक किंवा पोस्टाच्या आर.डी. मध्ये नुकसान होत नाही हे जरी खरे असले तरी त्यातून वार्षिक ७ किंवा ८% पेक्षा जास्त फायदासुद्धा मिळत नाही हि वस्तुस्थिती आहे. अधिक मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागतो तो वेगळा.

म्युच्युअल फंडाच्या योजनेत तुम्ही कायमपणे कधीच फायद्यात राहू शकत नाही मात्र यातून तुम्हाला दीर्घ मुदतीत किमान १२ ते १५% वार्षिक दराने परतावा तो सुद्धा चक्रवाढ दराने मिळण्याचा हेतू साध्य होऊ शकतो हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे.

गरज आहे तो थांबण्याची “श्रद्धा और सबुरी” आखिरकार सबुरीका फल हमेशा मिठाही होता है.

तुम्ही चालू असणारी एसआयपी बंद करायला सांगितलीत कि आम्हाला ती बंद करणे बंधनकारक आहे मात्र अशा वेळी आम्ही जे सांगतो ते तुम्ही ऐकलेत तर तुमचा निश्चित फायदाच होणार आहे हे लक्षात ठेवा.

हा माझा ताजा लेख वाचलात त्याबद्दल धन्यवाद. आवडला असेल तर जरूर माझ्या नावासकट पुढे पाठवा. Facebook आणि Twitter वर नावासकट शेअर करण्याश हरकत नाही.

Sadanand Thakur,

Thakur Financial Services,

15 Years experienced Mutual Fund Distributor

Cell: 9518752605 or 9422430302

Email: Sadanand.thakur@mutualfundmarathi.com

Visit us: https://www.mutualfundmarathi.com


Read more
  • Published in Articles
No Comments

गुंतवणूकीचे साधे नियम

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

गुंतवणूकीचे साधे नियम

गुंतवणूक म्हटले म्हणजे काही तरी किचकट प्रकार आहे असा समज आपण उगाचच करुन घेतो. साधे व सोपे नियम पाळले तर हिच गोष्ट फारच सोपी आहे हे समजून येईल. साधी गोष्ट हि आहे कि गुंतवणूकीचे साधे व सोपे नियम पाळून कोणतीही व्यक्ती चांगला गुंतवणूकदार होऊ शकते, ज्यामुळे मोठ्या चुकासुध्दा टाळता येतात. येथे मी तुम्हाला यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठीचे साधे व सोपे नियम सांगणार आहे.प्रथमत: प्लान तयार करा:प्रथमतः तुमच्या जोखीम घेण्याच्या तयारीनुसारच तुमच्या गुंतवणुकीचे नियोजन करा. गुंतवलेल्या रकमेपैकी जी रक्कमतुम्हाला पुढील २ ते ३ वर्षात लागणार असेल अशी रक्कम म्युच्युअल फंडाच्या लिक्वीड, मनी मार्केट, फ्लोटींग इंटरेस्ट रेट अथवा अल्प मुदतीच्या बॉण्ड मध्ये गुंतवा. जर तुम्ही या पुर्वी अल्प मुदतीच्या उदिष्टांकरीताची गुंतवणूक जास्त जोखमीच्या योजनेत केलेली असेल व जर ती फायद्यात असेल तर अथवा ती फायद्यात येताच रक्कम काढून घ्या व वर सांगितलेल्या योजनेपैकी योग्य त्या योजनेत गुंतवा. हे सांगावयाची गरज नाही कि बाजाराचा निचांक काय असेल अथवा उच्चांक काय असणार आहे याचे ठोकताळे बांधत बसू नका. प्रथमत: हे लक्षात ठेवा कि अल्प मुदतीच्या उदिष्टांकरीताची रक्कम सुरक्षीत ठेवण्याला प्राधान्य द्या. तुमच्या दिर्घ मुदतीच्या उदिष्टांसाठी म्युच्युअल फंडाच्या समभाग योजनेतच गुंतवणूक करा. यासाठी, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टी कॅप, संतुलित (Balanced Schemes and Balanced Advantage Fund) व इक्विटी सेव्हिंग्ज स्कीम अशा प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत, योग्य योजनेची निवड करण्यासाठी तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या. म्युचुअल फंड किंवा शेअरबाजारात गुंतवणूक करतना नेहमीच गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला महत्वपूर्ण असतो कारण तो त्याच्या अनुभवाचा वापर करून तुम्हाला सल्ला देत असतो.साधी गोष्ट:दिर्घ मुदतीच्या उदिष्टांसाठी समभाग योजनेतच गुंतवणूक करा व त्यासाठी डायव्हर्सीफाईड इक्वीटी योजनेची (शक्यतो लार्ज कँप किंवा लार्ज अँड मिड कँप फंड योजना) निवड करा. अल्प मुदतीच्या उदिष्टांकरीताची रक्कम फ्लोटींग रेट बॉण्ड फंड योजनेत गुंतवा. हे गुंतवणूकीचे मुळ नियम आहेत ते काटेकोरपणे पाळणेच तुमच्या हिताचे असते. तुमच्यासमोर गुंतवणूकीचे बरेच काही पर्याय उपलब्ध आहेत अथवा ते तुम्हाला सांगीतले जातील, जसे कि पेट्रो फंड, एमएनसी फंड, गिल्ट इ. स्पेशँलीटी अथवा सेक्टोरल फंडाच्या योजना असतात व त्यात गैर कहिही नाही. परंतु नविन गुंतवणूकदाराने चांगल्या म्युच्युअल फंड हाऊसच्या डायव्हर्सीफाईड इक्वीटी योजनेतच गुंतवणूक करण्याचा साधा नियम पाळावा. दिर्घ मुदतीत अशा योजना अत्यंत फायदेशीर होतात. जर एखाद्या तिमाहीत २५% पेक्षा जास्त नुकसान सहन करण्याची तुमची तयारी नसेल तर स्पेशँलीटी अथवा सेक्टोरल फंडाच्या योजनांपासून दुर रहाणेच शहाणपणाचे असते.हॉट स्टॉक व फंड योजना टाळा:जर तुम्ही या वर्षातील सर्वात चांगली कामगिरी करणा-या म्युच्युअल फंड योजनेत व समभागात गुंतवणूक केली असेल तर पुढिल वर्षी त्याच्या निचांकी कामगिरीची तयारी ठेवा. कारण साधा नियम लक्षात ठेवा ज्या गोष्टीची किंमत वर जाते ती खाली येणारच. यासाठीच Reversion to the Mean (परत मध्य गाठलाच जातो) हा नियम आहे.नियमित गुंतवणूक करत रहा:आपल्या गुंतवणूक करण्याच्या क्षमतेनुसार कमी अथवा जास्त रक्कम दर महा ठरावीक तारखेला गुंतवत रहाणे हाच जोखीम कमी करण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे, कारण बाजार उच्चांकी असताना गुंतवणूक करण्याचे या प्रकारेच टाळू शकता. शिवाय अशी सर्वकालीन शहाणी व हुशार व्यक्ती शोधूनही सापडणार नाही कि जी बाजाराचा कल, तेजीचा किंवा मंदीचा कालावधी (timing) बरोबर साधू शकेल.गुंतवणूक करा पण विकू नका:अल्प काळासाठी (वरचेवर) केलेले व्यवहार (trading) हे गुंतवणूकदारापेंक्षा फक्त ब्रोकरलाच श्रीमंत करतात. तसेच हि प्रवृत्ती आयकर विभागालाही आवडते. जर तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला भेटलात, कि जो असे सांगतो आहे कि मी अल्प काळाचे व्यवहार (trading) करुन भरपूर पैसे मिळवले आहेत, व तुम्ही याबाबत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलात तर मनाची तयारी ठेवा कि लवकरच तो या विषयावार बोलण्याचे टाळून दुस-याच एखाद्या विषयाला महत्व देऊ लागेल व ते तुम्हाला ऐकून घ्यावे लागेल. म्हणून साधा नियम पाळा कि फंडात अथवा स्टॉक मध्ये नियमीत गुंतवणूक करत रहा व ती विसरुन जा. यालाच म्हणतात Buy and Hold.टिपवर विश्वास ठेवून गुंतवणूक करु नका:कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणत्यातरी योजनेत गुंतवणूक करू नका. अनुभवी गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याप्रमाणेच गुंतवणूक कारणे तुम्हाला फायदेशीर होईल.जास्त व्याजाच्या मोहाला बळी पडू नका:जास्त व्याचाचे आमिष आहे म्हणून सहकारी पतसंस्था वगैरे ठिकाणी गुंतवणूक करू नका, कारण यातील एखादा संचालक जरी लबाडी करणारा निघाला तरी अशी संस्था बुडू शकते व तुमचे पैसेही बुडण्याची शक्यता असते.MLM, भीशी, चीट फंड इ. योजनांपासून दूर रहा:अशाप्रकारच्या योजनेतून फक्त सुरुवातीच्या लोकांनाच फायदा मिळतो व नंतर सामील होणाऱ्या सर्वच लोकांना नुकसान सोसावे लागते म्हणून अशा योजना जरी तुमचा जवळचा मित्र किंवा अगदी नातेवाईक घेऊन आला तरी त्याला नाही म्हणायला शिका हाच भविष्यात होणाऱ्या नुकसानीला टाळण्याचा एकच मार्ग आहे. एक लक्षात ठेवा जगात अशी कोणतीही योजना नसते कि जी तुम्हाला अल्प काळात श्रीमंत बनवू शकेल.शेअर बाजारातील डे-ट्रेडिंग, वायदेबाजार, कमोडीटी ट्रेडिंग आदी मोहांपासून दूर रहा.डे-ट्रेडिंग, वायदेबाजार, कमोडीटी ट्रेडिंग यातून झटपट पैसे मिळवण्याचे आमिष दाखवले जाते पण एक लक्षात ठेवा कि हा एक प्रकारचा सरकारमान्य जुगारच आहे व जुगार खेळून कोणीही श्रीमंत होऊ शकत नाही, जुगार चालवणारा मात्र श्रीमंत होतो हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. डे-ट्रेडिंग, वायदेबाजार, कमोडीटी ट्रेडिंग यातून कधीतरी अल्प काळात भरपूर फायदा होऊ शकतो मात्र तो एकदा का मिळाला कि याचे एकप्रकारे व्यसनच लागते, जे सुटता सुटत नाही व मग यात मिळालेला फायदा तर जातोच परत मुद्दलहि जाते, येथे लाखाचे बारा हजार होणे हि म्हण तंतोतंत लागू पडते.लवकर सुरुवात करा:एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कि शेअर बाजारातून फक्त दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारालाच उत्तम प्रकारचा फायदा हमखासपणे मिळत असतो म्हणून गुंतवणूकदार व्हा, ट्रेडर होऊ नका. सर्वसामान्य माणसासाठी म्युचुअल फंड हे शेअरबाजारात गुंतवणूक करण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे.शेअरबाजारात गुंतवणूक करण्यासाठी वेळ महत्वाची नसून तुम्ही किती काळ नियमीत गुंतवणूक करत रहाता हे महत्वाचे असते. नियमितपणे गुंतवणूक केल्यामुळे सरासरीचा फायदा होतो. चक्रवाढीची ताकद हि एक जादूच आहे असे समजा, यामुळे तुम्ही गुंतवलेली रक्कम दीर्घ काळानंतर अत्यंत वेगाने वाढू लागते हे लक्षात ठेवा. म्युच्युअल फंडाच्या समभाग योजनेतील गुंतवणूक हि नियमीतपणे व दिर्घ मुदतीसाठीच करत रहावयास हवी. गुंतवणूक करतानाच काळजी घ्या, तुमची उदिष्ठ लक्षात ठेवा, तुमच्या जोखीम स्विकारण्याच्या क्षमतेचे पुन:रअवलोकन करा, आणि महत्वाचे म्हणजे रोजच्या रोज शेअर बाजारावर केल्या जाणा-या टीका टिपणीला फार महत्व देऊ नका. तुमच्या भावना काबूत ठेवावयास शिकले पाहिजे. तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे त्यावर ठाम रहा. म्हणूनच जर तुम्ही अजून गुंतवणूकीला सुरुवात केली नसेल तर लगेचच वेळ फुकट न घालवता सुरुवात करा.

विमा हि गुंतवणूक नाही:

एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे कि जीवन विमा व गुंतवणूक हे पूर्णतः स्वतंत्र विषय आहेत याची गल्लत करू नका. विमा अत्यावश्यकच आहे परंतु तो गुंतवणूक म्हणून समजू नका. विमा फक्त टर्म इन्शुरन्स या प्रकारचाच घेतला पाहिजे.

देशात विमा व्यवसायाचे खाजगीकरण झाल्यापासून अनेक विमा कंपन्या अस्तित्वात आल्या असून त्यांनी जागोजागी त्यांच्या शाखा उघडलेल्या आहेत. सर्वच विमा कंपन्यांनी युनिट लिंक्ड इन्शुअरन्स प्लॅन अर्थात युलिप हे प्रॉडक्ट बाजारात आणलेली आहेत. अशी केलेली गुंतवणूक किमान ५ वर्ष पुर्ण झाल्याशिवाय काढता येत नाही, तसेच दर वर्षी किमान ५ वर्ष हप्ते भरावे लागतात. असेच अशा योजनेत अनेक प्रकारचे चार्जेस असतात ते समजून घेतलेत तर तुम्ही यात कधीही गुंतवणूक करणार नाही. कारण हे चार्जेस सारा फायदा खाऊन टाकतात. यातील चार्जेसवसुलीसाठी तुमची युनिट्स कमी होतात.

म्युच्युअल फंडात मात्र केव्हाही गुंतवणूक करता येते व केव्हाही काढता येते. तसेच गुंतवलेली संपूर्ण रक्कम गुंतवली जाते. यातील सर्वमिळून चार्जेस हे २.५% पेक्षा जास्त नसतात. युनिट्स पैसे काढल्याशिवाय कधीही कमी होत नाहीत. गरजेचेवेळी ५ दिवसात खात्यात पैसे जमा होतात.फक्त फायद्यात असताना गुंतवणूक काढण्याचे पथ्थ पाळणे हिताचे असते.

जर आपला अकाली मृत्यू झाला तर आपल्या पश्चात आपल्या प्रियजनांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विमा हा प्रत्येकालाच अत्यावश्यक आहे. मात्र तो टर्म इन्शुअरन्स स्वरूपात घेणे हे फायदेशीर असते. टर्म इन्शुअरन्समध्ये ३० वर्षे वयाच्या व्यक्तीला वार्षिक रु.७५०० मध्ये रु.५० लाखाचा विमा मिळतो. असा टर्म इन्शुअरन्स घेऊन बाकी रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवणे हेच ग्राहकाच्या हिताचे असते. म्युच्युअल फंड व टर्म इंशुरन्स चे एकत्रीकरण करुन विमा संरक्षण व गुंतवणूक वृध्दी असे उदिष्ट साध्य करता येऊ शकते व तेच फायदेशीर असते.

कोणतीही गुंतवणूक जर दीर्घ काळासाठी केली तर चक्रवाढ पद्धतीने मिळणाऱ्या व्याजाचा जास्तीत जास्त फायदा मिळतो. म्युचुअल फंडाच्या अनेक योजनांनी गेल्या २५ वर्षात सरासरी २०% पेक्षा जास्त परतावा मिळवून दिलेला आहे, म्हणूनच काही योजनेत १९९५/९६ सालात ज्यांनी रु.१ लाख रुपयांची गुंतवणूक केलेली होती त्या गुंतवणुकीचे आजचे मूल्य रु.५० लाख ते रु.१ कोटी ३५ लाख इतके झालेले आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी गेले २५ वर्षे नियमित दर महा रु.५००० एस.आय.पी. माध्यमातून गुंतवलेले आहेत त्यांची आजपर्यंत एकूण गुंतवणूक रु.१५ लाख इतकी झालेली आहे मात्र त्या गुंतवणुकीचे आजचे मूल्य सुमारे रु.३ कोटी ५० लाख इतके झालेले आहे. म्हणून गुंतवणूक करताना दीर्घ कालीनच विचार केला पाहिजे. बाजारात तेजी नंतर मंदी व मंदी नंतर परत तेजी हि आवर्तने चालूच असतात. मात्र शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीत दीर्घ काळात तेजी मंदीवर मात करून उत्तम परतावा देण्याची ताकद असते हे लक्षात ठेवले पाहिजे.

तुम्हाला जर आयकर कलम ८०-सी चा फायदा मिळण्यासाठी गुंतवणूक करावयाची असेल तर जीवन विमा, ५ वर्षांची बँक ठेव, पी.पी.एफ. याचेपेक्षा म्युचुअल फंडाच्या Equity Savings Schemes चा आपण विचार केला पाहिजे कारण यातून जास्त परतावा तर मिळतोच परत तीन वर्षे पूर्ण झाल्यावर पैसे काढण्याची सुविधासुद्धा उपलब्ध असते.

Read about simple rules of investment in Marathi. read about simple rules of investment- in Marathi. Understand simple rules of investment in Marathi. Learn simple rules of investmentServices offered by Thakur Financial Servicesstock/share market in Marathi. mutualfundmarathi.com
Read more
  • Published in Articles
No Comments

भविष्याची तरतुद

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

भविष्याची तरतूद:

भविष्याची तरतूद करण्यास म्युच्युअल फंडात नियमित व दीर्घकाळ गुंतवणूक करीत राहणे हाच एक उत्तम पर्याय आहे. लवकरात लवकर निर्णय घेऊन ताबडतोब सुरुवात करा.

तरुणपणात मौज मजेसाठी खर्च करण्याची मनोवृत्ती असतेच त्यात काही चूक आहे असं आम्ही म्हणत नाही मात्र थोडीशी काटकसर करून व अनावश्यक खर्चात थोडी कपात करून तुम्ही जर म्युच्युअल फंडात नियमितपणे गुंतवणूक केलीत तर तुमच्या अचानक उद्भवणा-या गरजांना या बचतीचा उपयोगच होईल.

बाजाराचे पुढील अगदी पांच वर्षांचेसुद्धा भविष्य कोणीच करू शकत नाही. जो कोणी असे सांगतो तो कदाचित जास्त आशावादी असेल.  बाजारात गुंतवणूक करताना ती नियमितपणे व काही दशकांसाठी करत रहाण्याराला मात्र उत्तमोत्तम परतावा मिळतो.  गुंतवणूक करताना शक्यतो वर्षांचा विचार करू नका, किमान एक दशकाचा व शक्यतो दोन/तीन दश्कांचाच विचार करा. तुम्ही जर नोकरी करत असाल तर जेवढी वर्षे तुम्हाला निवृत्त होण्यासाठी असतील तेवढी वर्षे नियमित गुंतवणूक करत रहा. जर वार्षिक २०% पेक्षा चाक्रवाढीने फायदा झालेला असेल तर त्यातली काही रक्कम काढून आपल्या गरजा, हौस/मौज जरूर पूर्ण करा.

Learn provision for future in Marathimutualfundmarathi.comRead about provision for future in MarathiServices offered by Thakur Financial Servicesstock/share market in MarathiUnderstand provision for future investment
Read more
  • Published in Articles
No Comments

तुम्हाला हे माहित आहे का?

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

तुम्हाला हे माहित आहे का?

महागाई दर वर्षी सरासरी ७% दराने वाढत असते

त्यामुळे आज जर तुमची गरज दर महा रुपये ३००००/- (तीस हजार) असेल तर अजून ३०वर्षाने तुमचे उत्पन्न किमान दर महा रु.२,१०,०००/- (दोन लाख दहा हजार) एवढे असावयास हवे.

बँक/पोस्ट वगैरे निश्चित उत्पन्न देणा-या साधनातून वार्षीक ९% दराने परतावा मिळत असला तरी त्यातुन ७% महागाई वजा केल्यास निव्वळ वाढ होते फक्त २% वार्षीक.  परत व्याजाचे उत्पन्न हे करपात्र आहे.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीत शेअर बाजाराची जोखीम असते परंतु दिर्घ मुदतीत म्युच्युअल फंडाच्या चांगल्या योजनेतून गेले २० वर्षे सरासरी २०% पेक्षा जास्त चक्रवाढ दराने परतावा मिळालेला आहे, आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने संपत्ती निर्माण करण्यासाठी व निवृत्तीपश्चात सुखी व समृध्द जीवनासाठी म्युच्युअल फंडाच्या योजनेत गुंतवणूक केली पाहिजे.

म्युच्युअल फंडच्या समभाग आधारीत योजनेत गुंतवणूकीचे फायदे:

१)     नियमीत दरमहा एसआयपीव्दारे गुंतवणूक केल्यास शेअर बाजरात जरी चढ उतार होत असले तरी सरासरीचा फायदा मिळाल्यामुळे दिर्घ मुदतीत चांगला परतावा मिळतो, वार्षीक सरासरी १५% पेक्षा जास्त मिळण्याची संधी असते.

२)     गुंतवणूक करताना भरलेली संपुर्ण रक्कम गुंतवली जाते, कारण कोणतेही चार्जेस नसतात.

३)     एक वर्षानंतर पैसे काढले असता मिळणारी संपुर्ण रक्कम करमुक्त असते.

४)     कर बचतीच्या योजना असतात ज्यात गुंतवणूक केली असता आयकर कलम ८०-सी अंतर्गत रु.१,५०,०००/- पर्यंतची रक्कम उत्पन्नातून वजावटीला पात्र असते.

५)     वार्षीक १५% परतावा धरल्यास व रिटायरमेंटसाठि ३० वर्षे नियमीत दरमहा रु.५०००/- मात्र गुंतवल्यास ३० वर्षानंतर गुंतवणूकीचे मुल्य सुमारे रु.३.५० कोटी (रुपये तिन कोटी पन्नास लाख) एवढे होते व त्यातून पुढे वार्षीक १२% दराने पैसे रु.३,५०,०००/- (तिन लाख पन्नास हजार) दर महिना आयुष्यभर काढता येतात, व उर्वरीत फंड मुल्य आपल्या पश्चात वारसाला मिळण्याची सोय.

६)     म्युच्युअल फंडाच्या योजनेत नियमीत गुंतवणूक करुन आपल्या अनेक स्वप्नांची पुर्तता, जसे कि घर, गाडी, मुलांचे उच्च शिक्षण, रिटायरमेंट आदींचे नियोजन करता येते.

७)     तज्ञ फंड मॅनेजर्स तुमच्या पैशांची काळजी घेत असल्यामुळे तुम्ही चिंता करण्याचे कारण नसते.

८) मागील कामगिरी एक रकमी गुंतवणुकीचे उदाहरण:

Reliance Growth Fund या योजनेत ज्यांनी १९९५ साली रु.१००००/- गुंतवले होते त्याची आत्ताचे मुल्य रु.८ लाख आहे.

९) मागील कामगिरी SIP:

ज्यांनी HDFC Equity Fund या योजनेत जाने १९९५ पासून दर महा  रु. १०००/- गुंतवले आहेत त्यांचे आजपर्यंत रु. २.४२ लाख गुंतवून झाले असून आत्ताचे मुल्य रु. ५२.७२ लाख एव्हडे आहे.

१०) नियमीत दर महा लाभांशाचे उत्पन्न मिळणारी योजना सुद्धा उपलब्ध आहे

Read more
  • Published in Articles
No Comments

शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत एक पाहा़णी

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत एक पाहा़णी

सर्वसामान्य जनतेने म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे आकर्षक माध्यम म्हणून स्वीकारले आहे व त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे.  महत्त्वाचे कारण म्हणजे सुलभता व पारदर्शकता. त्याचप्रमाणे, एखाद्याकडे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी पुरेसे भांडवल नसते, तर कोणाकडे भरपूर भांडवल आहे परंतु पुरेसा वेळ नाही अथवा पुरेसा अभ्यास व चिकित्सक दृष्टी यांचा अभाव असतो. अशा सर्वांसाठीच म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे आकर्षक माध्यम बनले आहे.  बरं यात गुंतवणूक करण्यासाठी फार मोठे भांडवलही लागत नाही. एकवेळ गुंतवणूक रुपये ५००० पासूनही करता येते अथवा दरमहा रुपये ५०० भरूनही गुंतवणूक करता येते. त्याचप्रमाणे बँकांचे व्याजदर हेही आकर्षक राहिलेले नाहीत कारण ते ३.५% ते ८% एवढेच आहेत. शिवाय बँकेचे व्याजावर इन्कम टॅक्सही लागू असतो.  तसेच महागाईही दरवर्षी साधारणपणे ४% तरी वाढतच असते. हे जगन्मान्य सत्य आहे की शेअर बाजारात दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली असता त्यातून संपत्ती निर्माण होण्याची ताकद असते. फक्त तिचे व्यवस्थापन तज्ज्ञ व्यक्तींद्वारे होणे गरजेचे असते.  बँक असो अथवा पोष्ट असो, त्यातील गुंतवणूक ही निश्चितच सुरक्षित असते. मात्र त्या गुंतवणुकीत,दरवर्षी वाढणार्‍या महागाईचा विचार करता, दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करण्याची ताकद मात्र नसते.  प्रत्येकजण अपरिमित कष्ट करून पैसे मिळवत असतो पण हेही लक्षात ठेवले पाहिजे की पैसा हासुद्धा पैसे निर्माण करू शकतो. पाहिजे असते ते थोडेसे नियोजन. There is no reward without risk. 

अर्थात भरपूर पैसे मिळवावयाचे तर थोडा धोका हा स्वीकारावाच लागतो, पण तो धोका म्हणजे जुगार असू नये. 

अमेरिकेत सन २००३मध्ये एक पाहा़णी करण्यात आली. जर एक डॉलर सन १८०२ साली चार वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये गुंतवला असता तर दरवर्षी वाढणारी महागाई विचारात घेतल्यानंतर सन २००३मध्ये त्या १ डॉलर गुंतवणुकीची खरी किंमत काय झाली असती ह्या प्रश्नावर केलेल्या सदर पाहणीत मिळालेले उत्तर खालीलप्रमाणे होते.

गुंतवणुकीचा पर्याय२०१ वर्षांनंतरगुंतवणुकीचे खरे मुल्य
सोने१.३९ डॉलर
ट्रेझरी बिल३०१ डॉलर
ट्रेझरी बाँड१,०७२ डॉलर्स
शेअर बाजार५,९७,४८५ डॉलर्स
  • Source: Jeremy Siegle, The Future for Investorsशेअर बाजारासंबधी गुंतवणुकितून दिर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करण्याची ताकद असते हे ऐतिहासीक सत्य आहे.
  • शेअर बाजारासंबंधीत गुंतवणूकीतून मिळालेला परतावा हा निश्चित उत्पन्न देणारे गुंतवणूक सादनातून मिळालेल्या उत्पन्नाचे 550 पटीने जास्त मिळालेला आहे. (Treasury Bonds).
Read more
  • Published in Articles
No Comments

आपला गुंतवणूक सल्लागार

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

आपल्या गुंतवणूक सल्लागाराचे मुल्यवर्धित सेवेबाबत आपण समाधानी आहात काय?

या महत्वाचे प्रश्र्नाकडे बरेचसे गुंतवणूकदार गांभीर्याने पहात नाहीत त्यांचे दृष्टीने महत्वाचे असते कि ते रोख्यात, म्युच्युअल फंडात, विम्यात कि बँकेचे कायम निधीत गुंतवणूक करतायत आपण ज्याचे मार्फत गुंतवणूक करत आहोत या गोष्टीला ते दुय्यम महत्व देतात आणि या मुळेच बरेच वेळा गुंतवणूकीचा निर्णय चुकीचा घेतला जाऊ शकतो.  बहुतेक गुंतवणूकदारांचे परीचयातीलच एखादी व्यक्ती गुंतवणूक प्रतिनीधी म्हणून फावल्या वेळेतील व्यवसाय करत असते आणि एखाद्या दिवशी तो गुंतवणूकदाराला भेटतो योजनेची अर्धी-मुर्धी माहीती देतो, यासाठी बहुदा तो ज्याकंपनीचे तो प्रतिनीधीत्व करत असेल त्या कंपनीचे नवीनच नियुक्त झालेल्या सेल्स मँनेजरला बरोबर घेऊन येतो आणि गुंतवणूकदार त्या तथाकथीत गुंतवणूकदार सल्लागारामार्फत आपण कष्टाने मिळविलेला पैसा गुंतवून मोकळा होतो.

काही काळानंतर केव्हातरी गुंतवणूकदाराला त्याचा एखादा मित्र किंवा परिचीत भेटतो सांगतो की मी एका चांगल्या गुंतवणूकदार सल्लागाराला भेटून माझ्या गुंतवणूकीचे नियोजन जाणीव पुर्वक केले व आज मी माझे गुंतवणूकीबाबत पुर्णत; नि:शंक व समाधानी आहे तेव्हा तो त्याने केलेल्या गुंतवणूकीचे मुल्य काय झाले हे पहाण्यासाठी आपल्या परिचीत गुंतवणूक प्रतिनीधीशी संपर्क साधतो तर त्याला उत्तर मिळते कि एक तर त्याने तो फावल्या वेळेतील व्यवसाय बंद केला आहे किंवा मी नंतर पाहून सांगतो, साहेबाना विचारून सांगतो किंवा असेच काहीतरी. एक अर्ज भरुन देणे, आवश्यक ती कागदपत्रे व चेक जोडून ते संबधीत कंपनीत पोहोचविणे आणि स्वत:चे कमिशनचा चेक खात्यात जमा झाला कि मौज करणे म्हणजे काही गुंतवणूक सल्लागार होता येत नाही.

काही तथाकथीत प्रतिनीधी विमा एजंट किंवा म्युच्युअल फंड वितरक म्हणून फक्त बाजारात येणा-या नविन योजनांचे अर्ज गुंतवणूकदाराला नेमाने देणे व योजनेचे फॉर्म भरुन ते संबधीत ठिकाणी पोहोचविणे एवढेच काम करत असतात.  त्यांचेकडे ते विकत असलेल्या योजनांची अत्यंत त्रोटक माहीती असते. बाजारातील सर्व घडामोडींबाबत ते अनभिज्ञ असतात.

खरे पहाता गुंतवणूक सल्लागाराकडे बाजारात उपलब्ध असणारे सा-याच गुंतवणूक पर्यांची अद्यावत माहिती असणे हे सद्याचे अस्थीर आर्थीक वातावरणातच नव्हे तर नेहमीच अत्यावश्यक आहे.  दरवर्षीच होणारे व्याजदरातील तसेच कररचनेतील बदलांमुळे या सर्वच बदलांची दखल घेऊन गुंतवणूकदाराला कोणताही पुर्वग्रह न ठेवता नि:पक्षपातीपणे गुंतवणूकीचा सल्ला मिळणे हा गुंतवणूकदाराचा हक्कच आहे.

गुंतवणूकदाराला त्याच्याकडील गुंतवणूकीसाठी असणारी अतिरीक्त रक्कम योग्य ठिकाणी गुंतवणे अत्यावश्यक असते व त्यासाठी योग्य गुंतवणूक सल्लागारच गुंतवणूकदाराला या बाबतचा निर्णय घेण्यास योग्य ती मदत करु शकतो आणि त्यासाठी गुंतवणूक सल्लागाराला पुर्णत: व्यावसाईक, अभ्यासू एवढेच असून चालत नाही तर त्याला त्याचे निर्णय ठामपणे व कोणत्याही पुर्वग्रह विरहीत दृष्टीकोन ठेऊन घेता आलेच पाहिजेत.

तुमचे गुंतवणूक सल्लागाराबाबत खालील प्रश्र्न स्वत:लाच विचारुन तुम्ही तुम्ही तुमचा निर्णय करु शकता: 

1)तुमचे गुंतवणूक सल्लागाराकडे आवश्यक ती शैक्षणीक पात्रता आहे का?

जेव्हा आपण म्युचअल फंड योजना, जीवन विमा, रोखे किंवा अन्यत्र गुंतवणूक करु इच्छीता तेव्हा त्याबाबत तुमचे वतीने निर्णय घेण्यासाठी तुमचा गुंतवणूक सल्लागार पुरेसा सक्षम आहे काय?

2)तुमचे गुंतवणूक सल्लागाराकडे पुरेशी माहिती आहे काय?

इंटरनेटच्या वापरामुळे व दुरदर्शन वरील निरनीराळ्या वृत्त व आर्थिक वाहीन्यांमुळे तसेच वर्तमान पत्रे व निरनीराळ्या नियतकालीकांमुळे आजकाल गुंतवणूक विषयासंबंधी माहिती आपणापर्यंत सहजपणे व नियमितपणे आपणा सर्वांपर्यंत पोहोचत असते.

तर अशा एजंटसोबत काम चालू ठेवायचे का याचा निर्णय करण्याची वेळ आली आहे.

इथेच खरी गोम आहे कि या माध्यमातूनच गुंतवणूकदाराला बरेच वेळा एजंट पेंक्षा अधिक माहिती उपलब्ध होत असते.  जर तुम्हाला असे आढळून आले कि तुमचे एजंट पेंक्षा तुम्हालाच जास्त माहिती आहे किंवा त्याला जे याबाबत माहित असावयास हवे ते त्याला माहितच नाही

3)तुमचे गुंतवणूक सल्लागाराकडे पुरेसा अनुभव आहे काय?

शिक्षणा बरोबरच किंबहूना अनुभव हा महत्वाचा घटक आहे. तुमचा एजंट तुमचे सारख्याच अनेक गुंतवणूकदाराना या पुर्वीपासून नियमीत सेवा देत असेल व जर तो पुर्णवेळ गुंतवणूक सल्लागार म्हणूनच काम करत असेल तरच तो अनुभवाने परिपुर्ण समजता येईल.

4)तुमचे गुंतवणूक सल्लागाराकडे स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता आहे काय?

तुमचा गुंतवणूक सल्लागार मागील कामगिरी, अस्थीरता, जोखीम व परतावा यातील गोष्टींची माहिती न देता तुम्हाला एकच योजना अथवा एकाच कंपनीच्या एकाच प्रकारचे गुंतवणूकीचे साधनात गुंतवणूक करावयास वारंवार सुचवत असेल तर त्यात त्याचा वैयक्तीक फायदा विचारात घेत असण्याची अधिक शक्यता असते.  जेव्हा तो तुम्हाला एखादे गुंतवणूकीचे माध्यम सुचवितो तेव्ह त्याला त्या योजनेच्या ब-या व वाईट बाबींबद्दल प्रश्र्न विचारुन तुमची खात्री करून घ्या तसेच त्या योजनेला पर्यायी योजनेत गुंतवणूक का करू नये याचे तो योग्य उत्तर देऊ शकतो का याची पडताळणी जरूत करा.  गुंतवणूकीचा सल्ला हा नेहमीच पुर्वग्रह विरहीत दृष्टीकोन ठेऊन व स्वतंत्रपणे विचार करून व फायद्याबरोबरच जोखीमीची माहिती सांगूनच दिला गेला पाहिजे.

5)तुमचे गुंतवणूक सल्लागाराकडे आवश्यक त्या सर्व अद्यावत सोयी सुविधा आहेत का?

तुमचे गुंतवणूक सल्लागाराकडे स्वत:चे कार्यालय, प्रशिक्षीत व पुरेसा कर्मचारी वर्ग,  आवश्यक ती सर्व सॉप्टवेअर्स नसतील तो तुम्हाला  हवी सेवा हव्या त्या वेळी देऊ शकत नाही.  आवश्यक वेळी रक्कम काढावयाची झाल्यास अशा परिस्थितीत विलंब होण्याचीच अधिक शक्यता असते. हे सारे अंतिमत: तुमच्या हिताचे नसते.  गुंतवणूकीचा व्यवसाय हा एक डायनँमीक व्यवसाय आहे कि जो एकाच तराजूत तोलता येत नाही आणि याची जाणीव तुमचे सल्लागाराकडे आहे याची खात्री करा.

6)तुमचा गुंतवणूक सल्लागार तुम्हाला कोणकोणत्या मुल्यवर्धीत सेवा देऊ शकतो हे गुंतवणूक करण्या पुर्वीच जाणून घेतलेत का?

तुमचा अर्ज व धनादेश योग्य ठिकाणी पोहोचवील्यानंतरच गुंतवणूक सल्लागाराचे खरे काम सुरू होते.  जर आपणास कोणत्याही कारणाने गुंतवणूकीचा खाते उतारा तुमचे पर्यंत पोहोचू शकला नाही तर तो तुम्हाला हव्या त्या क्षणी देण्याची सुविधा तुमचे गुंतवणूक सल्लागाराकडे असणे आवश्यक आहे, तसेच जर गुंतवणूक म्युच्युअल फंडासारखे शेअर बाजारसंबंधीत जोखीमीचे अधिन असेल तर तो देत असलेल्या सल्याला व देत असलेल्या मुल्यवर्धीत सेवेला फारच महत्व आहे.  तसेच तुमचे गुंतवणूकीवर लक्ष ठेवणे हे तुमचे काम आहेच पण तुमचे बरोबरच तुमचा गुंतवणूक सल्लागार सुध्दा या कामी जर तुम्हाला मदत करत असेल तर ते तुम्हाला अधीकच लाभदायकच असेल.

विचार करा तुम्ही निवडलेला गुंतवणूक सल्लागार वरीलसारखा तर नाही ना? आणि म्हणूनच तुम्ही स्वत:लाच प्रश्र्न विचारा कि मी माझ्या सद्याचे गुंतवणूक सल्लागाराकडूनच गुंतवणूक करत राहणे योग्य होईल का? आणि जर याचे उत्तर समाधानकारक नसेल तर तुमचे गुंतवणूक सल्लागार बदलण्याची वेळ आली आहे.

Read more
  • Published in Articles
No Comments

पतसंस्था व सोसायटी

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

पतसंस्था, क्रेडिट सोसायटी, सार्वजनीक ट्रस्ट, सहकारी गृहनिर्माण संस्था  अशा प्रकारचे संस्थाकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यायोग्य रक्कम असते.  मात्र अशा संस्था या सर्वसाधारणपणे बँकेच्या ठेवींमध्ये अल्प वा दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असतात.  या ठेवींवर रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार कधी कमी तर कधी जास्त व्याज मिळत असते. मात्र मिळणारे व्याज हे आयकराच्या स्लँब नुसार करपात्र असते. अशा संस्थाचे गुंतवणूकीचे सर्वात महत्वाचे उदिष्ट हे परताव्यापेक्षा सुरक्षीततेवर जास्त असते आणि अशा संस्थांकडे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे पैसे असतात जे सुरक्षीत ठेवणे हे ह्या संस्थाचे कर्तव्यच असते. यापैकी पतसंस्था हि सहकारी निबंधकाच्या नियंत्रणाखाली येत असल्यामुळे जर सहकारी निबंधकाची परवानगी असेल तरच अशा संस्था म्युच्यअल फंडाच्या समभाग आधारीत योजनेत गुंतवणूक करु शकतात.  मात्र सध्या त्याना अशी परवानगी नाही मात्र या संस्था म्युच्यअल फंडाच्या कर्जरोखे आधारीत योजनेत गुंतवणूक करु शकतात मात्र अशी गुंतवणूक हि नॉन एसएलआर गुंतवणूकीतच धरली जाते.  ट्रस्ट व सहकारी गृहनिर्माण संस्था मात्र त्यांची जोखीम स्विकारण्याची तयारी असल्यास म्युच्यअल फंडाच समभाग आधारीत तसेच अन्य कोणत्याही योजनेत गुंतवणूक करु शकतात.

म्युच्युअल फंडात गुंतवणूकीमध्ये बाजाराची जोखिम अंतर्भुत असल्यामुळे ट्रस्ट सारखे संस्थात्मक गुंतवणूकदार त्यापासून दुर रहाणेच पसंत करतात.  परंतु वस्तूस्थिती हि आहे कि जर म्युच्युअल फंडाच्या सर्वच योजनेत शअर बाजाराची जोखीम नसते पैकी लिक्वीड स्किममध्ये केलेल्या गुंतवणूकीमध्ये अशा प्रकारची शेअर बाजाराची कोणतीही जोखीम तर नसतेच, परत कर्जरोखे आधारीत अन्य योजनेत किमान व्याज दराच्या बदलाची व क्रेडिट रेटिंगची जी जोखीम असते ती सुध्दा लिक्वीड फंडात नगण्य स्वरुपाचीच असते. कारण या योजनेत जमा होणारी रक्कम हि प्रामुख्याने मनीमार्केट मध्ये जास्तीत जास्त ९१ दिवसाच्या मुदतीच्या निश्र्चित उत्पन्न देणा-या उच्च पतदर्जा असणा-या सिक्युरिटीजमध्येच केली जाते, त्यामुळे अशा योजनेत जोखीम जवळपास शुन्य असते.

लिक्वीड फंडात अगदी अल्प काळासाठी म्हणजे २ ते ४ दिवस ते कितीही काळासाठी गुंतवणूक करता येते. अगदी दर शुक्रवारी पैसे गुंतवून, लगेचच पैसे काढण्याचीही सुचना देता येते, पैसे सोमवारी (कामकाजाच्या दुस-या दिवशी) दुपारी १२ वाजेपर्यंत आपल्या बँक खात्यात जमा होतात.  मिळणारा परतावा हा मात्र ४ दिवसांचा मिळतो कारण अशा योजनेत हिस्टॉरीकल एनएव्ही मिळण्याची सुवीधा असल्यामुळे जरी शुक्रवारी (दुपारी २.३० पर्यंत) गुंतवणूक केली तरी एनएव्ही मात्र गुरुवारची मिळत असते व पैसे रविवारच्या एनएव्हीने परत केले जातात. इतिहासात आजपर्यंत तरी लिक्विड फंडाची एनएव्ही कमी झाल्याचे उदाहरण नाही. म्हणूनच जर का आपण ह्या सुवीधेचा वापर प्रत्येक आठवडा अखेर त्याचप्रमाणे वर्षातील सर्व बँक सुट्यांच्या दिवसांपुरती जरी वापरली तरी मिळणारे उत्पन्न हे जास्तीचेच असते.

तसेच ज्या संस्था वा व्यक्ती उच्च उत्पन्न गटात मोडतात व ज्याना एकूण ३२.४४५% आयकर भरावा लागतो अशानी जर या योजनेत गुंतवणूक डिव्हीडंड पेआऊट या पर्यायाखाली केली तर आयकरात ७.९५% बचत होते, कारण डिव्हीडंड डिस्ट्रीबुशन टँक्सची आकारणी करण्याची पध्दत वेगळी आहे.

लिक्वीड फंड योजनांची मागील कामगीरी जर का आपण पाहिली तर असे दिसून येते कि गेल्या एक वर्षात अशा योजनेतून ८% ते  ९% एवढा वार्षीक परतावा मिळालेला आहे. 

जर का आपण ३ वर्षे किंवा जास्तकाळ या योजनेत पैसे गुंतवून ठेवले तर इंडेक्सेशनचाही फायदा घेऊन होणा-या नफ्यावर फक्त १०% लॉंग टर्म भरावा लागतो  इंडेक्सेशन हे महागीईशी निगडीत असल्यामुळे सध्याचा महागाईचा दर (जवळपास ६%) विचारात घेतल्यास जवळपास काहीच कर भरावा लागत नाही. म्हणूनच ज्याना एक वर्षाच्या मुदत ठेवीत पैसे ठेवावयाचे असतील त्यांच्यासाठी हि योजना अतीशय फायदेशीर तर होतेच वर गरज लागल्यास केव्हाही पैसे मिळू शकतात.

हि योजना चँरिटेबल ट्रस्ट, पतसंस्था,संस्थात्मक गुंतवणूकदार, उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती यांचेसाठी सर्वोत्तम अशी आहे.

मूळ गुंतवणूक लिक्विड योजनेत गुंतवून एकदाच कॅपिटल अॅप्रीशिएशन सिस्टीमॅटिक ट्रान्स्फर व्दारे मुदलात वाढणारी रक्कम मात्र नियमित दररोज, साप्ताहिक, मासिक अथवा त्रैमासिक तत्वावर एखाद्या इक्विटी किंवा बॅलन्सड योजनेत वर्ग करण्याची सूचना दिली तर जोखीम फक्त मिळणारे फायद्यापुरतीच मर्यादित राहील.

लिक्वीड फंडाव्यतरीक्त डेब्ट फंडाच्या अनेक योजना उपलब्ध आहेत मात्र या योजनेत व्याजाचे दर बदलाची तसेच पतमापन दर्जाबदलाची जोखीम असते, ती लिक्वीड फंड योजनेत जवळपास शून्य असते.

या योजनेत गुंतवणूकीचे महत्वाचे फायदे:

१)     चांगला परतावा.

२)     एंट्री व एक्झीट लोड नाही.

३)     कमी एक्सपेन्स रेशो.

४)     मुदत नाही म्हणून पैसे केव्हाही काढता येतात.

५)     बँक ठेवीत पैसे ठरावीक मुदतीसाठी अडकून पडतात तसे या योजनेत अडकून पडत नाहीत.

६)     एकदा का खाते उघडले कि ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी पिन मिळते, तिचा वापर करुन हवे तेव्हा पैसे गुंतवता, काढता येतात.

७)     पैसे काढण्याची सुचना दुपारी २.३० पुर्वी, कोणत्याही कामकाजाच्या दिवशी दिली असता, कामकाजाच्या दुस-या दिवशी आपल्या खात्यात पैसे जमा होतात.

८)     असे खाते उघडण्यासाठी आम्ही मदत करतो.

एफएमपी (फिक्सड् मँच्युरिटी प्लान)

चँरिटेबल ट्रस्ट, पतसंस्था, संस्थात्मक गुंतवणूकदार, उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती ज्या एक ठरावीक काळासाठी गुंतवणूक करु इच्छीतात त्यांचेसाठी एफएमपी (फिक्सड् मँच्युरिटी प्लान) हा एक अतीशय फायदेशीर गुंतवणूक पर्याय आहे. या प्रकारच्या योजनेत ९१ दिवस ते ३ वर्षापर्यंत गुंतवणूक करण्याची सुवीधा असते.

या योजनेत गुंतवणूकीचे महत्वाचे फायदे:

१)     लिक्वीड फंडाप्रमाणेच जवळपास शून्य जोखीम.

२)     योजनेत जमा झालेले पैसे जेवढ्या काळाची एफएमपी असेल तेवढ्याच काळाच्या कमर्शीअल पेपर्स, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझीटस्, कर्जरोखे अशा निश्र्चित उत्पन्न देणा-या पर्यायातच केली जाते, ज्यांचा व्याजाचा दर अगोदरच ठरलेला असतो.

३)     अशा योजनेत एक वर्षापेक्षा कमी काळासाठी गुंतवणूक केली तर लिक्वीड फंडाप्रमाणेच कर बचतीचा फायदा होतो.

४)     मात्र जर गुंतवणूकीचा कालावधी ३ वर्षा पेक्षा जास्त असेल तर इंडेक्सेशनचाही फायदा घेऊन फक्त १०.१% लॉंगटर्म कँपिटल गेन टँक्स भरावा लागेल, म्हणजेच सुमारे २२.२% पर्यंत करबचत होते.

५)     अशा योजना शेअर बाजारात नोंदवल्या जातात, त्यामुळे आवश्यक तर पैसे केव्हाही काढता येतात.

६)     अशा योजनेत केलेल्या गुंतवणूक तारण ठेऊन काही बँका कर्जही देतात.

७)     अशा योजना अगदी थोड्या काळासाठीच गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतात. 

Read more
  • Published in Articles
No Comments

होय तुम्हीसुद्धा अब्जोपती बनू शकता

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

होय तुम्हीसुद्धा अब्जोपती बनू शकता.

या जगात प्रत्येक व्यक्तीचीच श्रीमंत बनण्याची इच्छा असते कोणी ती व्यक्त करतो तर कोणी असे बोलण्यासाठी कचरतो. आज काल महागाई एवढी वाढलेली आहे कि करोडपती होऊनही तुम्ही तुमच्या साऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकत नाही हि वस्तुस्थिती आहे. म्हणूनच आता आपण करोडपती नव्हे तर अब्जोपती कसे बनू शकू याचा विचार केला पाहिजे. परंतु होत काय कि जर आपण मध्यमवर्गीय असलो तर आपल्याला असे स्वप्न पाहण्याची सुद्धा भीती वाटते. हे मुळी अशक्यच आहे असच काहीस आपल्याला वाटत असत. परंतु जरी तुम्ही मध्यम वर्गीय असलात तरी सुद्धा तुम्ही निश्चितच अब्जोपती होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणू शकता. हे कसे शक्य आहे हेच या लेखात आपण पाहणार आहोत.

जर तुमची खरोखर श्रीमंत होण्याची इच्छा असेल व त्यासाठी थोडी काटकसर व नियमित शहाणपणाने गुंतवणूक करण्याची तयारी असेल तर हे निश्चित साध्य होऊ शकते. एक लक्षात घेतले पाहिजे कि आपल्या देशात जे काही अब्जोपती लोक आहेत ते काही एका दिवसात श्रीमंत झालेले नाहीत. त्यासाठी काही पिढ्या त्यांना कष्ट व नियमित व्यवसाय करावा लागलेला आहे. काही व्यक्ती दोन पिढ्यानंतर हे इप्सित साध्य करू शकलेल्या आहेत. फारच थोड्या व्यक्ती हे त्यांच्या जीवनातच अब्जोपती बनण्यात यशस्वी झालेल्या आहेत. आपण सुद्धा जर असा विचार केला कि ठीक आहे मी शक्यतो याच जन्मात अब्जोपती होण्याचा प्रयत्न करीन पण जर का ते नाही जमलं तर माझ कुटुंब पुढील पिढीत तरी अब्जोपती झालेलं असेलच हा विचार आपल्याला केला पाहिजे.

म्युचुअल फंड हे सर्वसामान्य लोकांसाठी गुंतवणूकिचे एक सर्वोत्तम माध्यम आहे. यातील इक्विटी स्कीम्स मधील गुंतवणूक ही शेअर बाजारात केली जाते. आपल्यापैकी बरेच जणांचे असे गैर समज असतात कि शेअर बाजार म्हणजे जुगार, हा जणूकाही आपल्यासाठी नाहीच. खर म्हणजे शेअर बाजार हाच संपत्ती निर्माण करण्यासाठी एक सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय आहे. परंतु शेअर बाजारात ट्रेडिंग अथवा गुंतवणूक करण्यासाठी त्याचे ज्ञान असणे आवश्यक असते मात्र ते सर्वांकडे असू शकत नाही व आपल्या नोकरी धंद्यातून तेवढा वेळ काढणेही सर्वांनाच शक्य होत हि नाही, हि वस्तुस्थिती आहे. अशा लोकांसाठीच तर म्युचुअल फंड आहे ना. कारण म्युचुअल फंड योजनांचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांच्याकडे तज्ञ असा फंड मॅनेजर असतो ज्याला सहाय्य करण्यासाठी रिसर्च टीम असते जी शेअर बाजारातील घडामोडींचा बारकाईने अभ्यास करून आपला रिपोर्ट फंड मॅनेजरला देत असते, त्याच्यावर विचार करून फंड मॅनेजर शेअर बाजारात कोणत्या कंपनीचे शेअर्स कधी व किती प्रमाणात व किती काळासाठी विकत घ्यावयाचे किंवा योजनेच्या पोर्टफोलिओ मध्ये असणारे कोणते शेअर्स सध्या विकावयाचे याचा निर्णय वेळोवेळी घेत असतो. काही कंपन्याच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आवश्यकता असल्यास टीम त्या कंपनीला भेट देऊन कंपनीची अधिक माहिती जमा करते. यासाठी कंपनीचे फंडामेंटल विश्लेषण केले जाते, भविष्यात त्या कंपनीला किती ऑर्डर्स मिळणार आहेत त्यातून किती नफा होऊ शकेल आदी सर्व गोष्टींचा विचार गुंतवणुकीचा निर्णय करण्यापूर्वी केला जातो. यामुळे भविष्यात त्या कंपनीच्या शेअरचा भाव किती प्रमाणात वाढू शकेल याचाही विचार केला जातो. या सर्व प्रक्रियेनंतरच प्रत्यक्ष गुंतवणूक कंपनीच्या शेअर्स मध्ये योग्य त्या प्रमाणात केली जाते. याशिवाय एका कंपनीत किती प्रमाणात गुंतवणूक करावयाची यासाठी काही नियम असतात त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते. एखाद्या योजनेतील गुंतवणूक शेअर बाजारात किती प्रमाणात करावयाची किती प्रमाणात कर्जरोख्यात करावयाची याबाबत योजना जाहीर करण्यापूर्वीच ते जाहीर केले जाते व याचे पालन होते आहे कि नाही हे ए.एम.सी. व सेबी मार्फत वेळोवेळी तपासले जाते. कोणकोणत्या शेअर्स मध्ये व किती प्रमाणात गुंतवणूक करावयाची याचेही नियम ठरलेले असतात व त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते. या सर्वच गोष्टींमुळे शेअर बाजारातील गुंतवणुकीची जोखीम म्युचुअल फंडात कमी होते. आपल्याला माहित असेलच जगात व आपल्या देशातही शेअर बाजाराला गेल्या २०० वर्षांपेक्षा जास्त काळाचा इतिहास आहे व असे दिसून आलेले आहे कि शेअर बाजारात दीर्घ मुद्तीत नेहमीच फायदा होतो. असे सिद्ध झालेले आहे कि कोणत्याही ५० वर्षात शेअर बाजारातील गुंतवणुकीवर सरासरी १२०००% एवढा प्रचंड नफा जगात सर्वत्रच झालेला आहे. म्हणूनच जगातील महान गुंतवणूक गुरु वॉरेन बफे असे सांगतो कि जेव्हा तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करता तेव्हा वर्षांचा नव्हे तर ४ ते ५ दशकांचाच विचार केला पाहिजे.

हे सत्य आहे कि शेअर बाजारात नेहमीच चढ उतार होतच असतात व यामुळे जर अल्पकाळाचा विचार केला तर शेअर बाजारात नफा किंवा नुकसान जास्त प्रमणात होण्याची शक्यता असते मात्र जर आपले उदिष्ट २० किंवा अधिक वर्षांचे असेल तर नेहमीच शेअर बाजारातील गुंतवणुकीतून फायदाच होत असतो आणि म्हणूनच शेअर बाजारातील चढ उतार हि जोखीम न समजता एक उत्तम संधी म्हणूनच पाहिले पाहिजे. म्युचुअल फंडाच्या अनेक चांगल्या योजनेतून गेल्या वीस वर्षात सरासरी २०% ते २५% वार्षिक चक्रवाढ पद्धतीने गुंतवणुकीवर परतावा मिळालेला आहे. आता हेच पहाना आपला सेन्सेक्स १९७९ साली सुरु झाला तेव्हा तो १०० होता आता तो ३२७०० च्या आसपास आहे, म्हणजेच सरासरी वार्षिक १८% चक्रवाढ पद्धतीने उत्पन्न सेन्सेक्सने गेल्या ३८वर्षात दिलेले आहे, व म्युचुअल फंडाने तर याहून जास्त दिलेले आहे कारण त्यांनी ते तसे दिले तरच त्या फंड मॅनेजरची हुशारी मानली जाते.

म्युचुअल फंडाच्या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी फार मोठी रक्कमही लागत नाही. दर महा अगदी रु.१००० पासून कितीही रक्कम गुंतवता येते. ज्यांनी गेले २० वर्षे नियमित दर महा रु.१००० काही चांगल्या योजनेत एस.आय.पी. माध्यमातून गुंतवलेले आहेत त्यांचे आजपर्यंत रु.२.४० लाख रक्कम गुंत्वावून झाली व आज त्याचे मूल्य रु.४५ लाख ते ५० लाख एवढे झालेले आहे.

आता असा विचार केला पाहिजे कि म्युचुअल फंडात दीर्घकाळ व नियमितपणे दरमहिना गुंतवणूक करण्याची माझी तयारी असेल तर मला भविष्यात चक्रवाढ पद्धतीने सरासरी किती उत्पन्न वार्षिक मिळू शकेल व यासाठी काही गणितीय सूत्र आहे काय? होय असे ढोबळमानाने सांगता येते कि देशाचा जो जी.डी.पी. (ठोकळ उत्पनाचा दर) असतो त्यात जर आपण वार्षिक महागाईचा दर मिळवला तर जेवढी संख्या येईल तेवढे किमान उत्पन्न गुंतवणूकदाराला म्युचुअल फंडातून मिळाले पाहिजे. जेव्हा आर्थिक प्रगती कमी असते तेव्हा जी.डी.पी. कमी असतो व महागाईचा दर जास्त असतो व जेव्हा देशाचा आर्थिक विकासाचा दर वाढू लागतो तेव्हा महागाईचा दर कमी होतो. सध्या आपल्या देशात जी.डी.पी. चा दर सरासरी ६% आहे व महागाईचा दर आहे ५% म्हणजेच तुम्हाला म्युचुअल फंडाच्या डायव्हरसिफाइड इक्वीटी योजनेतून वार्षिक किमान ११% पेक्षा जास्त जास्त उत्पन्न वार्षिक चक्रवाढ पद्धतीने मिळू शकेल, मागील इतिहास पाहता ते सरासरी १५% दराने मिळू शकेल. बहुतांशी हे तुम्हाला जास्तच मिळणार आहे पण १५% हे सुद्धा काही कमी नाही कारण बँकेत तुम्हाला ७% एवढेच व्याज मिळत असते, त्यातूनही महागाई व कर वजा केला तर निव्वळ आपले पैसे सुरक्षीत ठेवण्यासाठीच आपण बँकेत पैसे ठेवत असतो.

आता जर तुम्हाला अब्जोपती बनवायचे असेल तर दर महिना किती रक्कम गुंतवली पाहिजे व ती किती काळासाठी गुंतवली पाहिजे हे पाहूया. आता जर कर का तुम्ही दर महा फक्त रु.१००० गुंतवणार असाल व मिळणारा चक्रवाढ व्याजाचा वार्षिक दर १५% गृहीत धरला तर तुम्हाला ६३ वर्षे नियमित दर महा रु.१००० ची गुंतवणूक केली पाहिजे म्हणजे तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य रु.१०० कोटी म्हणजेच एक अब्ज एवढे होईल. पण हेच जर का तुम्ही दर महा रु.१०००० ची गुंतवणूक केली तर ४८ वर्षात तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य रु.१०० कोटी (एक अब्ज) होईल. आता हा काळ कमी करण्यासाठी काय केले पाहिजे? सुमारे ५० वर्षापूर्वी एखादी व्यक्ती जेव्हा नवीन नोकरीला लागायची तेव्हा त्याचा सुरुवातीचा पगार असायचा सुमारे रु.१२५/- दर महा, तेच जर आज पाहिले तर सुरुवातीचा पगार असतो साधारण रु.२५००० महिना. याचे कारण दर वर्षीच महागाई वाढत असते व त्यामुळे चलनाची किंमत कमी होते तर त्यामुळे दर वर्षीच पगार किंवा आपले उत्पन्न सरासरी १०% ते २०% वाढत असते आणि म्हणूनच गुंतवणूक करतानासुद्धा आपण दर वर्षी आपल्या गुंतवणुकीत वाढ केलीच पाहिजे, ती किती करावी तर किमान दर वर्षी १०% दराने केली पाहिजी. आता असे केले तर काय होईल ते पहा. जर का वरील उदाहरणात दर महा रु.१००० वार्षिक १०% वाढ करीत गुंतवले तर ५७ वर्षात रु.१०० कोटी होतील किंवा दर महा रु.१०००० वार्षिक १०% वाढ करीत गुंतवले तर ४२ वर्षात रु.१०० कोटी होतील.

मागील २५ वर्षात म्युचुअल फंडाच्या डायव्हरसिफाइड इक्वीटी योजनेत एस.आय.पी. माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक चक्रवाढ पद्धतीने मिळालेला परतावा सरासरी २३% एवढा आहे म्हणूनच खालील तक्त्यामध्ये, रु.१०० कोटी होण्यासाठी वार्षिक १०% दराने एस.आय.पी. मध्ये वाढ केल्यास वार्षिक १५% व वार्षिक २०% दराने परतावा मिळाल्यास किती वर्षे लागतील त्याचे गणित दिलेले आहे. याच बरोबर एक लक्षात ठेवले पाहिजे कि प्रत्येक वर्षीच महागाई काही प्रमाणात वाढतच असते व ज्यामुळे रुपयाची खरेदीची क्षमता कमी होत असते म्हणूनच मुदतीअखेर, वार्षिक ५% टक्के दराने महागाई वाढल्यास, रु.१०० कोटी रुपयांचे खरे मूल्य किती असेल ते हि दिले आहे. जर का तुम्हाला/तुमच्या कुटुंबाला अब्जोपती बनावयाचे असेल तर खालील तक्ता तुम्हाला गुंतवणुकीचे नियोजन करण्यास उपयुक्त होऊ शकेल. जर का आपल्या कुटुंबात एका पेक्षा जास्त व्यक्ती मिळवत्या असतील तर हे उदिष्ट लवकर साध्य करता येऊ शकेल, कारण तुम्ही जास्त रकमेची नियमितपणे गुंतवणूक करू शकाल.

जर का तुम्ही आज ३० वर्षाचे असाल तर तुमच्या मनात असे येऊ शकते कि, मी सतत काटकसर करून नियमितपणे गुंतवणूक करत रहावयाचे व अजून ४० वर्षांनी जर का मी अब्जोपती होणार असेन तर त्याचा मला काय फायदा कारण तेव्हा मी असेन ७० वर्षांचा,पण एक लक्षात घ्या हाच विचार जर ज्या आपल्या पूर्वजांनी केला असता तर त्यांनी कधीच माणगावी नारळाचे झाड कधीच लावले नसते कारण ते फळधारणा करण्यासाठी १५ ते २० वर्षे घेते, पण त्यांनी हा विचार न करता कृती केल्यामुळेच आपण आज अशी अनेक फळ आपण खात आहोत. तुम्ही जर असे केलेत तर तुमच्या म्हातारपणी तरी तुमची कदाचित सारी स्वप्न पूर्ण होऊ शकतील, किंवा तुमची पुढील पिढी तरी आर्थिक चिंतामुक्त जीवन जगू शकेल. कारण प्रत्येकाचीच एक इच्छा असते कि आपल एक चांगल घर असावे, गाडी असावी व आर्थिक चिंता मुक्त जीवन असावे हे तुमच्या बाबत किंवा तुमच्या पुढच्या पिढीला तरी भाग्य लाभेल.

म्युचुअल फंडात दर महा एस.आय.पी. रु.वार्षिक १०% एस.आय.पी. मध्ये वाढ केली तर १०० कोटी रुपये मूल्य होण्यास लागणारी वर्षे (परतावा १५%)वार्षिक ५% महागाईचा दर वजा केल्यावर १०० कोटी रुपयांचे मुदती अखेर खरे मूल्य कोटी रुपयेवार्षिक १०% एस.आय.पी. मध्ये वाढ केली तर १०० कोटी रुपये मूल्य होण्यास लागणारी वर्षे (परतावा २०%)वार्षिक ५% महागाईचा दर वजा केल्यावर १०० कोटी रुपयांचे मुदती अखेर खरे मूल्य कोटी रुपये
१०००५७५.९०५०८.७२
५०००५०८.७२४११३.५२
१००००४५११.१३३८१५.६६
१५०००४२१२.८८३५१८.१३
२००००४०१४.२०३४१९.०४
२५०००३९१४.९१३२२०.९८
३००००३८१५.६६३१२२.०४
४००००३६१७.२६३०२३.१३
५००००३४१९.०३२९२४.२९
६००००३३१९.९८२८२५.५०
१०००००२८४५.८१२५५०.५०
Read more
  • Published in Articles
No Comments

अनिवार्य सूचना (Disclaimers)

www.mutualfundmarathi.comया वेबसाईटची निर्मिती हि मराठी भाषिकांना त्यांचे मातृभाषेत म्युचुअल फंड व शेअरबाजाराची माहिती मिळावी म्हणून तयार केलेली आहे. या वेबसाईटची मालकी हि सदानंद ठाकूर याची असून येथील मजकूर पूर्व परवानगीशिवाय अन्यत्र पोस्ट करू नये. Thakur Financial Services ठाकूर फायनान्शियल सर्व्हीसेस ARN-46061 व्दारे म्युचुअल फंड वितरक म्हणून AMFI व अनेक AMC सोबत रजिस्टर आहे. या संकेतस्थळावर दिलेली माहिती, फायनान्शियल प्लानिंग सुविधा, कॅलक्यूलेटर व अन्य सुविधा हि तुमच्या म्हणजे या संकेतस्थळाला भेट देणार्यांच्या माहितीसाठी त्यांनी स्वत: उपयोगात आणण्यासाठी आहे. आम्ही यासाठी कोणतीही फी किवा अन्य कोणतेही मानधन आकारत नाही. ह्याचा वापर करून केलेली गुंतवणूक तसेच परिणाम देईल असा आमचा दावा नाही. म्युचुअल फंडात केलेली गुंतवणूक हि बाजाराच्या अधीन असते. मागील कामगिरी तशीच राहील अथवा राहणार नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी संबधित योजनेचे माहिती पत्रक वाचून व समजून घेऊन गुंतवणूक करा. (Disclaimer: Mutual Fund investments are subject to market risk, read all scheme related documents carefully. Past performance of the scheme may or may not sustain in future).

Design & Powered By S.N Enterprises

TOP
×