२. अर्थव्यवस्थापन व गुंतवणूकीचे पर्याय
प्रकरण २ रे
२. अर्थव्यवस्थापन व गुंतवणूकीचे पर्याय.
व्यक्तीगत अर्थव्यवस्थापन – काय काळजी घ्यावी?
प्रत्येक गोष्टीची सुरुवात करताना ती गोष्ट ती गोष्ट नवीनच असते हेच सुत्र गुंतवणूकीलाही लागू पडते. गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे अतीरिक्त रक्कम असणे आवश्यक आहे. कर्ज काढून कधीही गुंतवणूक करु नये. तुम्हाला जर दर महिना तुमच्या उत्पन्नापैकी काही रक्कम बचत करण्याची सवय नसेल तर तुम्ही गुंतवणूक करु शकत नाही, म्हणून माझा तुम्हाला सल्ला आहे कि खालीलप्रमाणे सवयी लावून घेणे आवश्यक आहे:१) अचानक उद्भवणा-या गरजेसाठी प्रथमत: तुम्ही तुमच्या ४ ते ५ महिन्याच्या उत्पन्नाएवढी रक्कम तुमच्या बँकेच्या बचत खात्यात किंवा म्युचुअल फंडाच्या लिक्विड योजनेत कायम शिल्लक ठेवली पाहिजे. यालाच इमर्जन्सी फंड असेही म्हणतात. या रकमेचा उपयोग कोणत्याही गुंतवणूक साधनात करु नका. हे पैसे केव्हाही उपयोगात आणण्यासाठी उपलब्ध असले पाहिजेत, म्हणूनच ते मुदत ठेवीत,शेअर्स अथवा कोणत्याही दिर्घ मुदतीच्या साधनात गुंतवू नका. ज्या बचत खात्याचे एटिएम कार्ड तुमच्याकडे असेल अशाच खात्याशी हि रक्कम निगडीत असली पाहिजे. अगदी इमर्जन्सीच्या वेळीच या रकमेचा उपयोग करा. अशी रक्कम ठेवण्याचा उद्देश एखाद्या आजारपणात होऊ शकतो, अपघात झाल्यास होऊ शकतो किंवा काही कारणाने नियमीत उत्पन्नाचे साधन काही काळ बंद झाल्यास होऊ शकतो.२) तुमच्या मासिक उत्पन्नाच्या ३० ते ३५ टक्के रक्कम नियमीतपणे बचत करण्याची सवय लाऊन घ्या व हा नियम काटेकोरपणे पालन करा. तसेच बचतीचे प्रमाण वाढवण्याची सवय स्वत:ला लावा. जसे उत्पन्न वाढत जाईल तशी बचतही वाढवत न्या. अचानक बोनस किंवा अन्य मार्गाने पैसे मिळाल्यास त्यातील बहुतांश रकमेची बचत करा. काटकसरीची सवय लावणे यासाठी उपयुक्त होते.३) अनावश्यक खर्च टाळा. ऐश करण्याची प्रवृत्ती न ठेवणे भविष्यात फायदेशिर होते. महागड्या हॉटेलात जाणे टाळा. अशाप्रकारे पैसे वाचवून ते गुंतवणूकीसाठी वापरण्याची सवय लावा.४) तुमच्या विवाहाच्या वर्षदिनी, तुमच्या वाढदिवशी तसेच घरातील अन्य व्यक्तींचे वाढ दिवशी तुम्ही काही शेअर्स विकत घ्या हि तुमची स्वत:ला दिलेली सर्वोत्तम भेट भविष्यात उपयोगी पडणार आहे.५) एखाद्या खर्चीक प्रवासाला किंवा सहलीवर उगाचच पैसे उडवण्याऐवजी त्या पैशांचे चांगल्या कंपनीचे शेअर्स विकत घ्या किंवा म्युचुअल फंडाच्या मल्टी कॅप योजनेत गुंतवा.६) तुम्ही अशाप्रकारे केलेल्या बचतीतून जास्त व्याज द्यावे लागणारी काही कर्जे, क्रेडिट कार्डचे देणे वगैरे प्रथमत: फेडून टाका कारण अशा प्रकारच्या कर्जावर २४ ते ३६% व्याज आकारले जाते. मी शेअर बाजारात गुंतवणूक करुन त्यातून भरपूर फायदा मिळवीन व अशी कर्जे फेडिन असे म्हणणे हा तद्दन मुर्खपणाच आहे. तेव्हा तुमच्याकडे असणारी कितीही छोटी किंवा मोठी रक्कम प्रथमत: तुमचे अतिरिक्त व जास्त व्याजाचे कर्ज फेडण्यासाठीच वापरा.७) निवृत्तीनंतर जे पैसे मिळणार असतात जसे कि पीएफ वगैरे त्या पैशाना अजिबात हात लावू नका,असे करणे म्हणजे म्हातारपण कष्टात जाणार हे लक्षात ठेवा. हे पैसे काढले तर तुमचा मालक जे तुमच्या बचतीएवढीच जी रक्कम त्यात भरत असल्यामुळे जी दिर्घ मुदतीत चांगला फायदा होण्याची संधी असते ती तुम्ही गमावून बसता. तसेच हि रक्कम जर तुम्हाला वाढीव पगार म्हणून देण्याची ऑफर आली तर ती कधीच स्विकारु नका.गुंतवणूकीचे विविध पर्याय व त्यापासून मिळणारा सरासरी परतावा.तुमच्यासमोर गुंतवणूकीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत, त्यापैकी योग्य तोच पर्याय तुम्ही तुमची जोखीम स्विकारण्याची मानसीक तयारी, गुंतवणूकीसाठी किती काळ देणे शक्य आहे वगैरे गोष्टी विचारात घेऊनच गुंतवणूकीचा पर्याय निवडला पाहिजे. जर शेअर बाजारातील चढ उतार तुम्ही पचवू शकता असे वाटत असेल तर शेअर्स खरेदी करा. जर तुम्ही बाजाराच्या चढ उताराला घाबरत असाल व जर तुम्हाला तुमच्या गुंतवणूकीवर निश्र्चित नियमीत दराने उत्पन्न हवे असेल तर निश्र्चित उत्पन्न देणा-या साधनातच गुंतवणूक केलेली चांगले असते. मात्र एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा कि उत्पन्न व जोखीम हे हातात हात घालूनच चालत असतात म्हणजे ज्या गुंतवणूकीत जास्त जोखीम असते तेथे उत्पन्न सुध्दा जास्त मिळण्याची शक्यता असते. आता काही उपलब्ध पर्याय पाहुया: १) शेअर्स – एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेणे म्हणजेच त्या कंपनीची त्या प्रमाणात भागिदारी स्विकारण्यासारखेच असते. शेअर्स हे एक्सचेंज मार्फत तुमच्या डिमँट खात्यात विकत घेता येतात किंवा जेव्हा ती कंपनी प्रथमच भांडवली बाजारात उतरते तेव्हा आयपीओ मधूनही विकत घेता येतात. जर तुम्ही दिर्घ काळासाठी (१५/२० वर्षांसाठी) गुंतवणूकीचा विचार करत असाल तर शेअर्स खरेदी करणे अतिशय फायदेशिर होते. अशा गुंतवणूकीत बाजाराच्या चढ उताराची जोखीम असते मात्र दिर्घ मुदतीत, एकूणच अर्थव्यवस्थेत होणा-या नियमीत वाढीमध्ये हि जोखीम सामावून घेण्याची ताकद असते. अशाप्रकारे केलेल्या गुंतवणूकीतून दोन प्रकारचे लाभ मिळतात – अ) लाभांश – कंपनीला होणा-या निव्वळ नफ्यापैकी काही रक्कम भागधारकाना लाभांश स्वरुपात वाटली जाते. मिळणारा लाभांशचे मिळणारे उत्पन्न करमुक्त असते. लाभांश हा वर्षात एकदा किंवा जास्त वेळा सुध्दा वाटला जातो. ब) मुल्य वृध्दी – कंपनी जस जशी तिच्या उलाढालीच्या माध्यमातून ताकदवान होत जाते तस तसे तिच्या शेअर्सचे मुल्य वाढत जाते. हा फायदाही तुम्हाला मिळतो.सर्वसाधारणपणे दिर्घ मुदतीत आघाडिच्या भारतीय कंपन्यांचे शेअर्समध्ये केलेल्या गुंतवणूकीवर वार्षीक सरासरी २५% च्या दरम्याने उत्पन्न मिळते. तेच जर का तुम्ही तुमचा शेअर्सचा पोर्टफोलीओचे व्यवस्थापन हुषारीने केलेत तर हेच उत्पन्न वार्षीक ४०% पर्यंत तुम्ही वाढवू शकता. यासाठी तुम्हाला योग्य वेळी बाजारातून शेअर्स खरेदी करावे लागतील तसेच अपेक्षीत नफा झाल्यावर योग्य वेळी ते तुम्हाला विकावेसुध्दा लागतील. |
२) कर्ज रोखे (बॉण्डस्): केंद्र व राज्य सरकार, महामंडळ आणि त्याप्रकारच्या संस्था भांडवल उभारणीसाठी अशा प्रकारचे कर्जरोखे बाजारात विक्रीसाठी आणत असतात. यांची मुदत हि एक वर्षापेक्षा जास्त काळाची असते व या कर्जरोख्यांवर ठरावीक दराने व्याज दिले जाते. सर्वसाधारणपणे कर्जरोख्याच्या माध्यमातून असे वचन दिले जाते कि मुद्दल अधिक ठरलेल्या वाजदराची रक्कम ठरावीक दिवशी परत करण्याची हमी दिलेली असते. काही कर्ज रोखे हे करमुक्त व्याज देतात तर काही कर्जरोख्यांवरील व्याजावर कर भरावा लागतो. भारतात कर्जरोख्यांवर मिळणारा परतावा हा साधारणपणे ८ ते १० टक्के या दरम्याने असतो, मात्र कराचा विचार केल्यास यातील गुंतवणूक जास्त फायदेशीर होते. ३) बँक ठेवी: बँक ठेवी, पोष्टाच्या ठेवी यात ठरावीक मुदतीसाठी ठरावीक व्याज दराने पैसे गुंतवता येतात. यापासून मिळणारे व्याजाचे उत्पन्न हे करपात्र असते. मिळणारे व्याज हे मुदतीनुसार ४% ते७.५०% या दरम्याने असते. मात्र कराचा विचार केल्यास हातात मिळणारे उत्पन्न कराचे दराप्रमाणे १० ते ३०% कमी होते. ४)म्युच्युअल फंड: अ) समभाग (इक्वीटी) आधारीत योजना: या प्रकारच्या योजनेतील गुंतवणूक हि शेअर बाजारात केली जाते. गुंतवणूकीसाठी अनेक प्रकारच्या योजना विविध उदिष्ठांनुसार असतात. या योजनेत केलेल्या गुंतवणूकीत शेअरबाजाराची जोखीम असते. अशा योजना दिर्घकाळासाठी फायदेशिर असतात. दिर्घ मुदतीत १८ ते ३०% वार्षीक परतावा या योजनेतून मिळालेला आहे.आ) कर्जरोखे (डेब्ट फंड) आधारीत योजना: या प्रकारच्या योजनेतील गुंतवणूक हि प्रामुख्याने कर्जरोखे (बॉण्डस्), मनी मार्केट, सी.डी./सीपी या साधनात केली जाते. शेअर बाजाराची जोखीम नसते मात्र व्याज दर बदलाची व पत बदलाची थोडी जोखीम असते. अल्प काळासाठी व दिर्घ काळासाठी वेगवेगळ्या योजना असताता. सरासरी परतावा ७% ते १०% वार्षीक मिळतो. |
५) रोख स्वरुपातील: यामध्ये उच्च तरलता असते. ट्रेझरी बिल, मनी मार्केट फंड, लिक्वीड फंड हे प्रकार यात मोडतात. सरासरी परतावा ७% मिळतो. पैसे केव्हाही काढता येतात हा यातील फायदा असतो. ६) जमिन-जुमला: जागा जमिनीत गुंतवलेल्या पैशावरही दिर्घ मुदतीत चांगला परतावा मिळतो मात्र गुंतवणूक कोणत्या ठिकाणी केली आहे यानुसार परतावा ठरतो. या गुंतवणूकीची एक मर्यादा म्हणजे रोखीकरण हवे तेव्हा करता येत नाही कारण विकत घेणारा उपलब्ध असणे आवश्यक असते, यामुळेच यातील गुंतवणूक लिक्विड (तरल) नसते. ७) सोने: मुख्यत्वेकरुन हि भावनीक गुंतवणूक आहे, गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय आहे कि नाही याबाबत वेगवेगळे मत-प्रवाह आहेत. ८) अन्य पर्याय: कमोडिटीज्, जुन्या वस्तू, परदेशी चलन इ. |
- Published in Capital Market
भविष्याची तरतुद
भविष्याची तरतूद:
भविष्याची तरतूद करण्यास म्युच्युअल फंडात नियमित व दीर्घकाळ गुंतवणूक करीत राहणे हाच एक उत्तम पर्याय आहे. लवकरात लवकर निर्णय घेऊन ताबडतोब सुरुवात करा.
तरुणपणात मौज मजेसाठी खर्च करण्याची मनोवृत्ती असतेच त्यात काही चूक आहे असं आम्ही म्हणत नाही मात्र थोडीशी काटकसर करून व अनावश्यक खर्चात थोडी कपात करून तुम्ही जर म्युच्युअल फंडात नियमितपणे गुंतवणूक केलीत तर तुमच्या अचानक उद्भवणा-या गरजांना या बचतीचा उपयोगच होईल.
बाजाराचे पुढील अगदी पांच वर्षांचेसुद्धा भविष्य कोणीच करू शकत नाही. जो कोणी असे सांगतो तो कदाचित जास्त आशावादी असेल. बाजारात गुंतवणूक करताना ती नियमितपणे व काही दशकांसाठी करत रहाण्याराला मात्र उत्तमोत्तम परतावा मिळतो. गुंतवणूक करताना शक्यतो वर्षांचा विचार करू नका, किमान एक दशकाचा व शक्यतो दोन/तीन दश्कांचाच विचार करा. तुम्ही जर नोकरी करत असाल तर जेवढी वर्षे तुम्हाला निवृत्त होण्यासाठी असतील तेवढी वर्षे नियमित गुंतवणूक करत रहा. जर वार्षिक २०% पेक्षा चाक्रवाढीने फायदा झालेला असेल तर त्यातली काही रक्कम काढून आपल्या गरजा, हौस/मौज जरूर पूर्ण करा.
- Published in Articles
गुंतवणूक कशी करावी?
सध्याचे परिस्थितीत म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी?
जर आपण अवलोकन केले तर असे दिसून येते कि गेल्या दिड वर्षात सेन्सेक्स १८००० पासून जवळपास २९००० पर्यत वर गेलेला आहे अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यात काय फायदा असा विचार अनेकांच्या मनात येत असतो. बाजार १५ हजार असताना गुंतवणूक केली असती तर बरे झाले असते मग गुंतवणूक यात करावी कि नाही असे वाटणे सहाजीकच आहे. पण ज्याना दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करावयाची आहे त्यानी ती केव्हाही सुरु करावी असा नियम आहे.
अर्थशास्त्राच्या नियमानुसार कोणत्याही वस्तुची किंमत जेव्हा वर जाते तेव्हा ती परत खाली येतेच व परत जेव्हा खाली येते तेव्हा ती नंतर परत वर जातेच. जेव्हा सर्वच लोकांना एखादी वस्तू काहि कारणाने महाग होईल असे वाटू लागते तेव्हा बरेच लोकं ती वस्तू खरेदी करण्यासाठी उताविळ होतात व त्या वस्तूची किंमत वाढू लागते या उलट जेव्हा सर्वानाच वाटू लागते कि आता आपणाजवळ असणारी वस्तूची किंमत कमी होणार आहे व ते सारेच ती विकण्याच्या मागे लागतात व किंमत कमी होऊ लागते. अर्थशास्त्राचा दुसरा नियम हा वस्तूची किंमत हि वस्तूच्या मागणी व उपलब्धतेवर अवलंबून असते, जेव्हा बाजारात एखाद्या वस्तुची उपलब्धता कमी असते व तिची मागणी जास्त असते तेव्हा तीची किंमत वाढते व उपलब्धता जास्त झाली व मागणी कमी झाली कि किंमत कमी होते. हे चक्र अव्याहतपणे चालूच असते, आणि म्हणूनच शेअर बाजारातही कधी तेजी असते तर कधी मंदी असते. मात्र कधीही कायम तेजी अथवा मंदी रहात नाही, राहूच शकत नाही. मात्र सध्या जर आपणास एक रकमी गुंतवणूक करावयाची असेल तर आपण ती रक्कम म्युच्युअल फंडाच्या–लिक्वीड योजनेत गुंतवावी (या योजनेतील गुंतवणूक हि प्रामुख्याने ९० दिवसांचे निश्र्चित उत्पन्न देणा-या गुंतवणूक साधनात केली जात असते) –
या योजनेत सध्या व्याजदर चढे असल्यामुळे वार्षीक सरासरी ८.५% ते ९% च्या दरम्याने परतावा मिळत आहे व तेथून एसटीपी (सिस्टीमँटीक ट्रान्सफर प्लान) व्दारे डायव्हर्सिफाईड इक्वीटी योजनेत साप्ताहीक तत्वावर वर्ग करण्याचा पर्याय निवडावा, मुदत साधारणपणे ३ ते ५ वर्षाची असावी. याचा फायदा असा होतो कि लिक्वीड फंड योजनेतील गुंतवणूकीवर तुम्हाला ८.५०% ते ९% दराने परतावा मिळत राहील व एसटिपीव्दारे बाजाराच्या सर्वच स्तरावर तुमची गुंतवणूक होत राहिल्यामुळे दिर्घ मुदती तुम्हाला फारच आकर्षक परतावा मिळू शकेल.
दुसरे म्हणजे या परिस्थितीत एसआयपी (सिस्टिमँटीक इंन्व्हेस्टमेंट प्लान) माध्यमातून दर महा ठरावीक तारखेला दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत रहाणे, यातही तुम्ही साप्ताहिक गुंतवणूकीचा पर्याय निवडू शकता. तुमच्या बँकेच्या बचत खात्यात पैसे शिल्लक ठेवलेत कि झाले. तुमच्या मासिक उत्पन्नातील काही भाग तुम्ही या प्रकारे गुंतवून जेव्हा बाजारात परत तेजी येईल तेव्हा आकर्षक परतावा मिळवू शकाल.
थोडक्यात नियमीत गुंतवणूक, दिर्घ मुदत, थोडा संयम व आपल्या गुंतवणूकीच्या निर्णयाची ठामपणे अंमलबजावणी याव्दारे तुम्ही भविष्यात चांगले उत्पन्न मिळवू शकाल.
तुमच्या गरजेप्रमाणे सर्वप्रकारच्या योजनाम्युच्युअल फंडात असतात. समभाग आधारित योजनेत शेअर बाजाराची जोखीम असते तर कर्ज रोखे आधारित योजनेत शेअर बाजाराची जोखीम नसते मात्र व्याजाचे चढ उताराची व पत मानांकनाची जोखीम असते, मात्र हि जोखीम लिक्विड फंड योजनेत सर्वात कमी, म्हणजे नाहीचे बरोबरच, असते. म्युचुअल फंड योजनेत केलेल्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन तज्ञ फंड मॅनेजर्स करत असतात हा सर्वात मोठा फायदा असतो.
- Published in About Mutual Fund
गुंतवणुकिचे व्यवस्थापन
गुंतवणुकीचे व्यवस्थापनः
तसं पाहिले असता म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर्स हे आपल्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करतच असतात त्यामुळे आपल्याला काही वेगळे व्यवस्थापन करण्याची गरज नसते. मात्र म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर्सवरती योजनेच्या उद्दिष्टांचे बंधन असते व एका मर्यादेबाहेर त्यांना खरेदी-विक्री करता येत नाही आणि म्हणूनच मार्केट जेव्हा मोठ्या प्रमाणात कोसळते तेव्हा NAV सुद्धा कमी होते. वर्ष २००८ मध्ये शेअर बाजार २१ हजार ते ७५०० पर्यंत कोसळला होता मात्र तो तसा एकाच दिवशी कोसळला नव्हता तर तो टप्या टप्प्याने खाली आला होता. आपल्याला त्यामागचे जागतिक मंदी, अमेरिकेत झालेला सबप्रईमचा घोटाळा, परदेशात दिवाळखोरित निघालेल्या अनेक आर्थिक संस्था इ. कारणे ज्यावेळी आपल्याला समजली त्यावेळी ज्यांनी आपली गुंतवणूक निष्क्रियपणे पाहत न बसता एक तर काढून घेतली अथवा म्युच्युअल फंडचे डेब्टस फंडात वर्ग केली व मार्केट जसं जसं खाली येत गेले त्या त्या वेळी पुनःर्गुंतवणूक केली अथवा डेब्टस फंडातून इक्विटी फंडात वर्ग केली त्यांना मात्र फायदाच झाला.
सर्वोत्तम पर्याय म्हणजे नियमीत दरमहा गुंतवणूक करत रहाणे व जर आपण दरमहा रु.२०००० पेक्षा जास्त करणार असाल तर अँटो डेबीटचे ४ फॉर्म भरुन महिन्यात साधारणपणे ७-८ दिवसाचे फरकाने ४ वेळा गुंतवणूक करावी, अशी गुंतवणूक केली असता सरासरीचा सर्वोत्तम फायदा मिळतो. माझा अनुभव आहे कि अशा प्रकारे गुंतवणूक करत राहील्यास १० वर्षात एखादे वर्ष सोडल्यास उर्वरीत ९ वर्षे चांगला फायदा होतो.
जर एकरकमी गुंतवणूक करावयाची असेल तर प्रथमत: म्युच्युअल फंडाचे कर्जरोखे (Debt Fund Scheme) आधारीत योजनेत गुंतवणूक करुन तेथुन नियमीत वर्ग योजनेव्दारा (Systematic Transfer Plan) समभाग योजनेत दर आठवडा तत्वावर वर्ग करावी जेणे करुन वरील प्रमाणे नियमीत गुंतवणूकीचाच लाभ मिळतो.
साधारणपणे ८/१० वर्षात एका मोठ्या मंदीचे व एका मोठ्या तेजीचे बाजारात आवर्तन होत असते, अर्थात असा काही नियम नाही. मात्र गेले अनेक दशके याप्रमाणे घटना घडलेल्या आहेत. माझा अनुभव असे सांगतो कि जर का बाजारातून सलग ४/५ वर्षे दर साल दर शेकडा जर का २०% पेक्षा जास्त परतावा मिळाला तर नंतरचे वर्षात एक मंदी येते व बाजारात बऱ्यापैकी करेक्शन येते. जर का असा परतावा तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर मिळाला तर एक तर पैसे काढून घ्यावेत अथवा त्याच फंडाचे लिक्विड योजनेत पैसे वर्ग करून तेथून सिस्टीमॅटीक ट्रान्स्फर प्लान चा वापर करून परत काही ठराविक कालावधीत रक्कम परत मूळ योजनेत आणावी. यामुळे काय होईल कि जर बाजार खाली आला तर झालेला फायदा कायम राहून त्यात जास्त भर पडेल. जर बाजार वर गेला तर फक्त फायद्यातच नुकसान होईल, झालेल्या फायद्यात नुकसान होण्यापेक्षा हे केव्हाही चांगले.
अर्थात जर का आपण नियमितपणे गुंतवणूक करत असाल व आपण वर्षांचा नव्हे तर काही दशकांचा, दोन दशके, तीन दशके असा आपले गुंतवणुकीचा कालावधी ठरवलेला असेल तर तुम्ही काहीच न करता, फक्त नियमितपणे गुंतवणूक करत राहणेच तुमच्या फायद्याचे होईल. कारण सारासरीमध्ये बाजारातील चढ उतारावर मात करण्याची फार मोठी ताकद असते.
- Published in About Mutual Fund